शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळासाठी आता नवीन डेडलाइन; २०२४ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:50 IST

पनवेलजवळ ११६० हेक्टर जागेवर सोळा हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : देशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. परंतु विविध कारणांमुळे विमानतळाचे काम रखडले आहे. परिणामी विमानाचे टेकऑफही लांबणीवर पडले आहे. असे असले तरी सिडकोने आता २०२४ ची नवीन डेडलाइन जाहीर केली आहे. विमानतळ उभारणीचे काम अदानी समूहाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन टेकऑफ होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.

पनवेलजवळ ११६० हेक्टर जागेवर सोळा हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील हे दुसरे अंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाच्या उभारणीचा ठेका जीव्हीके या कंपनीला देण्यात आला होता. त्यानुसार जीव्हीकेने विमानतळाच्या पहिल्या टप्यातील प्रकल्पपूर्व कामांना सुरूवातही केली होती. परंतु ही कामे अंतिम टप्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे जीव्हीकेने माघार घेतली. त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये नवीन ठेकेदार म्हणून अदानी समूहाचा या प्रकल्पात शिरकाव झाला.

विशेष म्हणजे अदानी समूहाकडे विमानतळाच्या कामाची हस्तांतरण प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे. सिडकोच्या संचालक मंडळासह राज्य सरकारच्या संबंधित विभागानेही त्यावर मोहर लावली आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून विमानतळाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाईल, असा विश्वास डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केला  आहे. तीन टप्यात उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाला २००८ मध्ये केंद्र सरकारची परवानगी मिळाली. त्यानंतर २०१२ पर्यंत पहिला टप्या पूर्ण होणे अपेक्षित होते. पण भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच आवश्यक विविध प्राधिकरणांच्या परवानगी आदींसाठी विलंब झाला. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास २०१६ ची वाट पाहवी लागली. सुरूवातीच्या काळात पुनर्वसन आणि प्रकल्पूर्व कामांवर भर देण्यात आला.

१८ फ्रेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानुसार २०१९ मध्ये नवी मुंबई विमानतळावरून पहिले टेकऑफ होईल, असे जाहीर केले होते. परंतु हा मुहूर्तही टळला. त्यानंतर २०२० चा मुहूर्त निश्चित करण्यात आला. परंतु हे संपूर्ण वर्ष कोविडविरूध्द लढण्यात गेल्याने विमानाच्या उड्डाणाला पुन्हा ब्रेक लागला. त्यानंतर पुन्हा २०२२ चा मुहूर्त जाहीर करण्यात आला. परंतु स्थलांतराला ग्रामस्थांचा होत असलेला विरोध, कोरोनाचा संसर्ग व ठेकेदाराची माघार आदी कारणांमुळे विमानतळाच्या कामाला खीळ बसली आहे. त्यानंतर आता २०२४ ची नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.

प्रस्तावित विमानतळाची प्रवासी क्षमता

नवी मुंबई विमानतळाचे काम तीन टप्यात पूर्ण करण्याची योजना आहे. यातील पहिल्या टप्यात वर्षाला १ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्यात अडीच कोटी प्रवाशांची ने-आण करता येणार आहे. तिसऱ्या टप्यात सहा कोटी प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.

नामकारणाचा वाद

विमानतळ प्रकल्पपूर्ण होण्याअगोदरच त्याच्या नामकारणाचा वाद सुरु झाला आहे. राज्य सरकारने प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिक प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अलिकडेच मोर्चाही काढला होता. तसेच विमानतळाच्या नामकारणासाठी राज्य सरकारला १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको