शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

नेवाळीतील जागा बिल्डरांच्या घशात?

By admin | Updated: June 25, 2017 04:02 IST

नेवाळीच्या धावपट्टीसाठी घेतलेली आणि सध्या नौदलाच्या ताब्यात असलेली जमीन शेतकऱ्यांना परत केली जात नसली, तरी ती बिल्डरांना विकली जात

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी घेतलेली आणि सध्या नौदलाच्या ताब्यात असलेली जमीन शेतकऱ्यांना परत केली जात नसली, तरी ती बिल्डरांना विकली जात असल्याची प्रकरणे समोर आली असून याकडे महसूल कर्मचारी डोळेझाक करत असल्याचा आरोप विविध नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जर या जमिनी देशहितासाठी ताब्यात असतील, तर त्या अचानक बिल्डरहिताच्या कशा झाल्या, असा सवालही या नेत्यांनी केला आहे.ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेल्या १६७६ एकर जागेपैकी धामटण गावातील ३५ एकर जागा एका बिल्डरच्या नावावर करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी निदर्शनास आणले. या जागेचा फेरफार महसूल विभागाने कशाच्या आधारे केला, असा सवालही त्यांनी केला. धामटण गावात १९४२ नंतर कॉलराची साथ आली होती. त्यात गावातील अनेक जणांचा मृत्यू झाला. बहुतांश गाव साथीला बळी पडले. त्यामुळे या गावातील जागेचा फेरफार होत असल्याची बाब कोणाच्या लक्षात आली नसेल, असा अंदाज जमीन बचाव आंदोलन समितीचे अध्यक्ष मथुर म्हात्रे यांनी व्यक्त केला.कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनीही एका बिल्डरने नेवाळीतील बाधित शेतकऱ्यांची जागा घेतल्याचा आरोप केला. नेवाळीच्या जागेत फेरफार करुन बिल्डरने ही जागा कशाच्या आधारे घेतली, असा सवाल करून त्यांनी या प्रकरणाची कागदपत्रे गोळा केल्याचे सांगितले. जागा शेतकऱ्यांना न देता बिल्डरांच्या नावे कशी केली जाते, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.नेवाळी येथील जागा परत करण्यासाठी मी गेली सात वर्षे प्रयत्न करतो आहे. आता संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या बैठकीत काय तोडगा निघतो, ते पाहू. २०१४ मध्ये नेवाळीच्या जागेवर अतिक्रमण करुन स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पाच जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात पाच कोटींची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात पुढे काय कारवाई करण्यात आली. आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर केले की नाही, याचीही विचारणा आमदार गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे केली आहे. सरकारकडे कागदपत्रे नाहीत!१९९६ साली उल्हासनगरच्या तहसीलदारांनी ठाण्याच्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविले होते, की जमीन विमानतळासाठी संपादित केल्याच्या कागदपत्रांचा शोध घेतला, पण कोणतीही कागदपत्रे तालुक्याच्या दप्तरी सापडलेली नाहीत. नेवाळी जमीन देण्याचा बाबतीत जे फेरफार नोंद करुन मंजूर करण्यात आले ते १९५४ व १९५५ मध्ये झाल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे. शेतकऱ्यांना किती नुकसानभरपाई दिली, याचेही रजिस्टर व कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले होते.