शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीतील जागा बिल्डरांच्या घशात?

By admin | Updated: June 25, 2017 04:02 IST

नेवाळीच्या धावपट्टीसाठी घेतलेली आणि सध्या नौदलाच्या ताब्यात असलेली जमीन शेतकऱ्यांना परत केली जात नसली, तरी ती बिल्डरांना विकली जात

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी घेतलेली आणि सध्या नौदलाच्या ताब्यात असलेली जमीन शेतकऱ्यांना परत केली जात नसली, तरी ती बिल्डरांना विकली जात असल्याची प्रकरणे समोर आली असून याकडे महसूल कर्मचारी डोळेझाक करत असल्याचा आरोप विविध नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जर या जमिनी देशहितासाठी ताब्यात असतील, तर त्या अचानक बिल्डरहिताच्या कशा झाल्या, असा सवालही या नेत्यांनी केला आहे.ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेल्या १६७६ एकर जागेपैकी धामटण गावातील ३५ एकर जागा एका बिल्डरच्या नावावर करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी निदर्शनास आणले. या जागेचा फेरफार महसूल विभागाने कशाच्या आधारे केला, असा सवालही त्यांनी केला. धामटण गावात १९४२ नंतर कॉलराची साथ आली होती. त्यात गावातील अनेक जणांचा मृत्यू झाला. बहुतांश गाव साथीला बळी पडले. त्यामुळे या गावातील जागेचा फेरफार होत असल्याची बाब कोणाच्या लक्षात आली नसेल, असा अंदाज जमीन बचाव आंदोलन समितीचे अध्यक्ष मथुर म्हात्रे यांनी व्यक्त केला.कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनीही एका बिल्डरने नेवाळीतील बाधित शेतकऱ्यांची जागा घेतल्याचा आरोप केला. नेवाळीच्या जागेत फेरफार करुन बिल्डरने ही जागा कशाच्या आधारे घेतली, असा सवाल करून त्यांनी या प्रकरणाची कागदपत्रे गोळा केल्याचे सांगितले. जागा शेतकऱ्यांना न देता बिल्डरांच्या नावे कशी केली जाते, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.नेवाळी येथील जागा परत करण्यासाठी मी गेली सात वर्षे प्रयत्न करतो आहे. आता संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या बैठकीत काय तोडगा निघतो, ते पाहू. २०१४ मध्ये नेवाळीच्या जागेवर अतिक्रमण करुन स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पाच जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात पाच कोटींची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात पुढे काय कारवाई करण्यात आली. आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर केले की नाही, याचीही विचारणा आमदार गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे केली आहे. सरकारकडे कागदपत्रे नाहीत!१९९६ साली उल्हासनगरच्या तहसीलदारांनी ठाण्याच्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविले होते, की जमीन विमानतळासाठी संपादित केल्याच्या कागदपत्रांचा शोध घेतला, पण कोणतीही कागदपत्रे तालुक्याच्या दप्तरी सापडलेली नाहीत. नेवाळी जमीन देण्याचा बाबतीत जे फेरफार नोंद करुन मंजूर करण्यात आले ते १९५४ व १९५५ मध्ये झाल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे. शेतकऱ्यांना किती नुकसानभरपाई दिली, याचेही रजिस्टर व कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले होते.