शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 23:34 IST

पनवेल, कळंबोलीतील १२४१ जणांवर कारवाई ; जरब निर्माण करण्यात अपयश

मयूर तांबडेनवीन पनवेल: दुचाकी, चार चाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये आणि जर अति आवश्यक फोन असेल तर वाहन थांबवून बोलावे. पण तरीही  मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.

विशेष म्हणजे शासकीय बस, शासकीय वाहने यांच्यावरील चालकही गाडी चालविताना मोबाइलवर बोलत असताना दिसतात. पोलीसही यात मागे नाहीत. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उजव्या हातात गाडीचे हॅण्डल आणि डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. तर काही गाडी चालवित असताना  संदेश वाचत असतात.  

मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होऊ शकतो. दुचाकी चालविताना मान वाकडी करून खांदा आणि मानेमध्ये मोबाइल पकडून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असतात.  त्यामुळे अशांना पकडण्याची विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची गरज आहे. दंडात्मक कारवाईबरोबरच वाहन परवाना निलंबित करण्याचे प्रमाण वाढले तरच या अशा वाहनधारकांमध्ये जरब निर्माण होईल. तसेच मोबाइल जप्त केले तर अशा प्रकारांना आळा बसेल.  

२०० रुपये दंड वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम कमी असल्याने अनेकदा वाहनचालक मोबाइलवर बोलताना आढळून येतात. मात्र चिरीमिरी देऊन त्यांना सोडून दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारवाईची भीती कमी झाली असल्याचे दिसून येते.  

पनवेल आणि परिसरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. यापुढेही अशा चालकांवर कारवाई करणार आहोत. वाहन चालविताना कोणीही मोबाइलवर बोलू नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आपली काळजी आपणच घ्यावी.तरच अपघातापासून वाचता येईल.- एन. विश्वकारकळंबोली वाहतूक शाखा

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNavi Mumbaiनवी मुंबई