शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मार्केटच्या पुनर्बांधणीकडे मनपाचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 24, 2015 01:40 IST

मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले कोळी बांधवांचे गाव, अशी ओळख असलेल्या दिवाळे गावातील मासळी बाजाराला समस्यांनी वेढले आहे.

नवी मुंबई : मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले कोळी बांधवांचे गाव, अशी ओळख असलेल्या दिवाळे गावातील मासळी बाजाराला समस्यांनी वेढले आहे. अपुरे नियोजन, जागेअभावी या ठिकाणी असलेल्या मासळी विक्रेत्यांनी रस्त्याची अडवणूक केली आहे. या मासळी बाजारात दरदिवशी वेगवेगळ््या भागांतील नागरिक मासे खरेदीसाठी येतात. मात्र या ठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच गाड्या उभ्या करून मासे खरेदी केली जाते. त्यामुळे येथील रस्त्यावर वाहतुकीस अडथळे निर्माण होतात आणि विक्रेत्यांनी पदपथावरील जागा अडवल्याने येथे चालणेही मुश्कील होत आहे. नवी मुंबर्ई पालिकेने या मासळी बाजाराच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी अनेक समस्या उद्भवत आहेत. या ठिकाणी वेळोवेळी साफसफाई न केल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून, त्या ठिकाणी असलेले नादुरुस्त पंखे, विक्रेत्यांना टोपल्या ठेवण्यासाठी जागा नसल्याने मासळी बाजारात जागेचा प्रश्न उद्भवत आहे. मासे विक्रेत्यांना जागेचे अचूक वाटप न करून दिल्याने विक्रेत्यांची मनमानी वाढत असून, नवीन विक्रेत्यांना मात्र या मनमानीला सामोरे जावे लागत आहे. या मासळी बाजारात प्रत्येक विक्रेत्याला तीन फुटाच्या अंतरावर एक भिंत बांधून जागा उपल्बध करून दिली, तर जागेअभावी बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे होणारी रस्त्याची अडवणूक थांबविता येईल, असे मत येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले; तर सर्व सोयीसुविधांयुक्त तसेच मोठी जागा असलेले मासळी बाजार प्रशासनाने उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी असलेल्या मासळी विक्रेत्यांनी केली. स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांनी या मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणीची मागणी केली असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून लाभार्थींना या ठिकाणी जागेचे वाटप केले जाणार असून, पुनर्बांधणीचा प्रस्तावही लवकर मार्गी लावण्यात येईल.