शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

पेणमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची आवश्यकता

By admin | Updated: November 16, 2016 04:35 IST

राज्यातील देवेंद्र सरकार व स्वत: मुख्यमंत्री विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असताना शेकापच्या सर्वांगीण विकासात

पेण : राज्यातील देवेंद्र सरकार व स्वत: मुख्यमंत्री विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असताना शेकापच्या सर्वांगीण विकासात पेण शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने आरोप-प्रत्यारोपाचे दिवस संपलेत, आता भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त प्रशासनावर भाजपाचा विकासरथ चालत असून पारदर्शक, गतिमान प्रशासन व स्मार्ट सिटी या बाबींवर सरकारचा भर आहे. सरकारच्या प्रामाणिक इशाऱ्यांनी गल्लीतला गोंधळ दूर होत आहे. जनता थेट सरकारच्या प्रामाणिक प्रशासनावर खूश असल्याने दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र सरकार जनहिताची कामे करीत असल्याने पेणच्या मतदारांनी पेण शहराचा सर्वांगीण विकासासाठी २७ नोव्हेंबरला सर्जिकल स्ट्राइक करून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा, असे प्रतिपादन महावीर मार्गावरील चौक सभेत रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केले. यावेळी नगर विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन के ले.यावेळीआ. संजय केळकर, आ. प्रशांत ठाकूर व शेकाप आ. धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. पेणच्या या प्रचाराच्या चौक सभेत पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या प्रश्नाशी आम्ही प्रामाणिक आहोत, कालही होतो, आजही आणि उद्याही राहू, असे या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावलेले आ. धैर्यशील पाटील व आ. केळकर यांनी स्पष्ट करून पेण अर्बनच्या ठेवीदारांच्या केल्या जाणाऱ्या दिशाभूलवर चांगलाच प्रहार केला. पेण पालिकेने ही निवडणूक विकास व्हिजन व नागरी सुविधांबाबत असून गेल्या पाच वर्षात जे तुमच्या तंबूत होते तेव्हा तुम्हाला चालले, आता मात्र त्यांच्यावर दोषारोप करून दूषणे देण्यात तुमची स्वार्थी भूमिका स्पष्ट होते. तर शहराच्या नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात तुम्हाला का अपयश आले, याची जनतेला चांगली माहिती आहे. विकासाच्या नावाखाली टक्केवारीचा आलेख उंचावून स्वत:च्या कुटुंबाचा विकास करण्यावर भर दिला असे नाव न घेता आ. धैर्यशील पाटील यांनी सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधारी मंडळींच्या दादागिरीला न भिणारे आम्ही इथे बसलोत त्यामुळे नागरिकांनी यांची चिंता करू नये, असे आ. प्रशांत ठाकूर म्हणाले. पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी प्रथमच स्पष्ट केले की, नागरिकांनी बनविलेल्या नगर विकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालो. आ. धैर्यशील पाटील यांच्यासारखा स्वच्छ माणूस व लोकप्रतिनिधी आमच्या सोबत असल्याने आमचं पटलं, पण काही मंडळींना हे कसं काय असा धसका बसला. पेण शहराच्या विकासाचा २५ वर्षांचा व्हिजन प्लॅन करणारी मंडळी या आघाडीत आहेत असा ठाम विश्वास पालकमंत्री मेहता यांनी दिला. (वार्ताहर)