शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

पेणमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची आवश्यकता

By admin | Updated: November 16, 2016 04:35 IST

राज्यातील देवेंद्र सरकार व स्वत: मुख्यमंत्री विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असताना शेकापच्या सर्वांगीण विकासात

पेण : राज्यातील देवेंद्र सरकार व स्वत: मुख्यमंत्री विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असताना शेकापच्या सर्वांगीण विकासात पेण शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने आरोप-प्रत्यारोपाचे दिवस संपलेत, आता भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त प्रशासनावर भाजपाचा विकासरथ चालत असून पारदर्शक, गतिमान प्रशासन व स्मार्ट सिटी या बाबींवर सरकारचा भर आहे. सरकारच्या प्रामाणिक इशाऱ्यांनी गल्लीतला गोंधळ दूर होत आहे. जनता थेट सरकारच्या प्रामाणिक प्रशासनावर खूश असल्याने दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र सरकार जनहिताची कामे करीत असल्याने पेणच्या मतदारांनी पेण शहराचा सर्वांगीण विकासासाठी २७ नोव्हेंबरला सर्जिकल स्ट्राइक करून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा, असे प्रतिपादन महावीर मार्गावरील चौक सभेत रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केले. यावेळी नगर विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन के ले.यावेळीआ. संजय केळकर, आ. प्रशांत ठाकूर व शेकाप आ. धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. पेणच्या या प्रचाराच्या चौक सभेत पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या प्रश्नाशी आम्ही प्रामाणिक आहोत, कालही होतो, आजही आणि उद्याही राहू, असे या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावलेले आ. धैर्यशील पाटील व आ. केळकर यांनी स्पष्ट करून पेण अर्बनच्या ठेवीदारांच्या केल्या जाणाऱ्या दिशाभूलवर चांगलाच प्रहार केला. पेण पालिकेने ही निवडणूक विकास व्हिजन व नागरी सुविधांबाबत असून गेल्या पाच वर्षात जे तुमच्या तंबूत होते तेव्हा तुम्हाला चालले, आता मात्र त्यांच्यावर दोषारोप करून दूषणे देण्यात तुमची स्वार्थी भूमिका स्पष्ट होते. तर शहराच्या नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात तुम्हाला का अपयश आले, याची जनतेला चांगली माहिती आहे. विकासाच्या नावाखाली टक्केवारीचा आलेख उंचावून स्वत:च्या कुटुंबाचा विकास करण्यावर भर दिला असे नाव न घेता आ. धैर्यशील पाटील यांनी सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधारी मंडळींच्या दादागिरीला न भिणारे आम्ही इथे बसलोत त्यामुळे नागरिकांनी यांची चिंता करू नये, असे आ. प्रशांत ठाकूर म्हणाले. पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी प्रथमच स्पष्ट केले की, नागरिकांनी बनविलेल्या नगर विकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालो. आ. धैर्यशील पाटील यांच्यासारखा स्वच्छ माणूस व लोकप्रतिनिधी आमच्या सोबत असल्याने आमचं पटलं, पण काही मंडळींना हे कसं काय असा धसका बसला. पेण शहराच्या विकासाचा २५ वर्षांचा व्हिजन प्लॅन करणारी मंडळी या आघाडीत आहेत असा ठाम विश्वास पालकमंत्री मेहता यांनी दिला. (वार्ताहर)