शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पेणमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची आवश्यकता

By admin | Updated: November 16, 2016 04:35 IST

राज्यातील देवेंद्र सरकार व स्वत: मुख्यमंत्री विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असताना शेकापच्या सर्वांगीण विकासात

पेण : राज्यातील देवेंद्र सरकार व स्वत: मुख्यमंत्री विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असताना शेकापच्या सर्वांगीण विकासात पेण शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने आरोप-प्रत्यारोपाचे दिवस संपलेत, आता भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त प्रशासनावर भाजपाचा विकासरथ चालत असून पारदर्शक, गतिमान प्रशासन व स्मार्ट सिटी या बाबींवर सरकारचा भर आहे. सरकारच्या प्रामाणिक इशाऱ्यांनी गल्लीतला गोंधळ दूर होत आहे. जनता थेट सरकारच्या प्रामाणिक प्रशासनावर खूश असल्याने दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र सरकार जनहिताची कामे करीत असल्याने पेणच्या मतदारांनी पेण शहराचा सर्वांगीण विकासासाठी २७ नोव्हेंबरला सर्जिकल स्ट्राइक करून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा, असे प्रतिपादन महावीर मार्गावरील चौक सभेत रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केले. यावेळी नगर विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन के ले.यावेळीआ. संजय केळकर, आ. प्रशांत ठाकूर व शेकाप आ. धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. पेणच्या या प्रचाराच्या चौक सभेत पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या प्रश्नाशी आम्ही प्रामाणिक आहोत, कालही होतो, आजही आणि उद्याही राहू, असे या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावलेले आ. धैर्यशील पाटील व आ. केळकर यांनी स्पष्ट करून पेण अर्बनच्या ठेवीदारांच्या केल्या जाणाऱ्या दिशाभूलवर चांगलाच प्रहार केला. पेण पालिकेने ही निवडणूक विकास व्हिजन व नागरी सुविधांबाबत असून गेल्या पाच वर्षात जे तुमच्या तंबूत होते तेव्हा तुम्हाला चालले, आता मात्र त्यांच्यावर दोषारोप करून दूषणे देण्यात तुमची स्वार्थी भूमिका स्पष्ट होते. तर शहराच्या नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात तुम्हाला का अपयश आले, याची जनतेला चांगली माहिती आहे. विकासाच्या नावाखाली टक्केवारीचा आलेख उंचावून स्वत:च्या कुटुंबाचा विकास करण्यावर भर दिला असे नाव न घेता आ. धैर्यशील पाटील यांनी सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधारी मंडळींच्या दादागिरीला न भिणारे आम्ही इथे बसलोत त्यामुळे नागरिकांनी यांची चिंता करू नये, असे आ. प्रशांत ठाकूर म्हणाले. पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी प्रथमच स्पष्ट केले की, नागरिकांनी बनविलेल्या नगर विकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालो. आ. धैर्यशील पाटील यांच्यासारखा स्वच्छ माणूस व लोकप्रतिनिधी आमच्या सोबत असल्याने आमचं पटलं, पण काही मंडळींना हे कसं काय असा धसका बसला. पेण शहराच्या विकासाचा २५ वर्षांचा व्हिजन प्लॅन करणारी मंडळी या आघाडीत आहेत असा ठाम विश्वास पालकमंत्री मेहता यांनी दिला. (वार्ताहर)