शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

खारफुटीच्या रक्षणासाठी ग्रीन पोलीस यंत्रणेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:21 IST

एमएमआरडीए क्षेत्रामध्ये खारफुटीची कत्तल करण्याच्या घटना वाढत आहेत, या विषयी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु त्यांचा तपास गतीने होत नाही.

नवी मुंबई : एमएमआरडीए क्षेत्रामध्ये खारफुटीची कत्तल करण्याच्या घटना वाढत आहेत, या विषयी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु त्यांचा तपास गतीने होत नाही. पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी या गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्याची गरज असून, त्यासाठी ग्रीन पोलीस यंत्रणा राबविण्याची गरज असल्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराला समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही वनसंपदा जतन करणे आवश्यक आहे; परंतु काही ठिकाणी विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. उच्च न्यायालयानेही याची दखल घेऊन कांदळवन देखरेख समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीमध्ये वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात पर्यावरणप्रेमींनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या आधारावर संबंधितांवर गुन्हेही दाखल झाले आहेत; पण दाखल झालेल्या गुन्ह्यांचा गतीने तपास होत नाही. पोलीस स्टेशनमध्ये यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उपलब्ध नाही. यामुळे शासनाने एमएमआरडीए परिसरामध्ये पर्यावरणविषयी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशी मागणी द नेचर कनेक्ट, श्री एकविरा आई प्रतिष्ठान व वॉचडॉग फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.द नेचर कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, कांदळवन संरक्षणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जास्तीत जास्त गुन्हे नोंदवू शकते. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस तपासासाठी एक ते दोन महिने लावतात. वेळकाढूपणामुळे आरोपी सापडतच नाहीत. जेएनपीटी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ४५०० वृक्षांचे नुकसान झाले आहे; परंतु या प्रकरणी संबंधितांवर काहीच कारवाई झालेली नाही. दास्तान फाटा येथे मातीचा भराव टाकल्यामुळे खारफुटीचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई