शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी हवा सल्लागार, कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या

By नारायण जाधव | Updated: September 20, 2022 16:33 IST

रस्ते विकास महामंडळाकडून शोध सुरू.

नवी मुंबई : कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या रेवस ते रेड्डी या ४९८ किमीच्या सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी आता राज्य रस्ते विकास महामंडळाने सल्लागाराचा शोध सुरू केला आहे. सध्या इच्छुकांकडून महामंडळाने स्वारस्य अभिकर्तासाठीचे प्रस्ताव मागविले असून इच्छुकांची पूर्व प्रस्ताव बैठक येत्या २७ सप्टेंबर २०२२ रोजी महामंडळाच्या कार्यालयात होणार आहे. तर तांत्रिक निविदा सादर करण्याची मुदत १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. महामंडळाने रेवस-रेड्डी सागरी महामार्गाची आणखी एक पाऊल उचलल्याने कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या आहेत. हा सल्लागार भूसंपादनापासून ते अवॉर्ड स्टेजपर्यंत सर्व ती मदत आणि परवानग्या मिळवून देण्याचे काम करणार आहे. ४९८ किमीच्या या मार्गासाठी ९,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

३३ प्रमुख शहरे जाेडणारआधीच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग उभारला जात आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार दुपदरी मार्ग उभारला जाणार होता. मात्र, आता त्यात बदल केला असून सुधारित आराखड्यानुसार सुमारे १६५ किमीचा रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर उर्वरित रस्ता दुपदरी असेल. तसेच ३३ प्रमुख शहरे/गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेतली जाणार आहेत.

केळशीसह धरमतर खाडीवर होणार पूलया सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी खाडीवर नव्याने पूल उभारले जाणार आहेत. यातून वाहनांचा वेढा वाचणार असून प्रवासाचे अंतर घटणार आहे. यातील केळशी खाडीवर पुलाची उभारणीसाठी १४८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. तर धरमतर खाडीवर रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या दोन किमीच्या सागरीपुलावर रस्ते विकास महामंडळ ८९७ काेटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. सध्या रेवस- कारंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यात दोन तासांचा अवधी लागतो. तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. मात्र, पावसाळ्यात फेरी सेवा बंद असल्याने प्रवास करणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे. तसेच यापुलामुळे जेएनपीटी बंदरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अलिबागसह कोकणाशी जोडले जाणार आहे.

चार टप्प्यांत होणार कामया सागरी महामार्गाच्या पहिल्या भागामध्ये उरण तालुक्यातील चिर्ले गाव ते बाणकोटपर्यंत १५० किलोमीटर, दुसऱ्या भागामध्ये रायगड जिल्ह्यातील बाणकोट ते रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडपर्यंत १४० किलोमीटर, तिसऱ्या भागामध्ये जयगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाक्षितीठापर्यंत १२८ किलोमीटर व चौथ्या भागात खाक्षितीठा ते रेवस बंदरापर्यंत १२२ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई