शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

एपीएमसीला आंतरराष्ट्रीय मार्केट बनविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:34 IST

चंद्रकांत पाटील यांचे मत : कृषिपूरक व्यवसायाच्या गाळ्यांचा शुभारंभ संपन्न

नवी मुंबई : देशात हरित क्रांतीमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही उत्पादने परदेशात गेली तर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला दर मिळेल. यासाठी परदेशात मागणी असलेल्या पावडर, ताजी, पिकणारी अशा विविध फॉरमॅटमध्ये उत्पादने तयार होणे गरजेचे आहे. यासाठी एपीएमसी मार्केटमधे सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून एपीएमसीला आंतरराष्ट्रीय मार्केट बनविण्याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. गुरु वार, २९ आॅगस्ट रोजी तुर्भे येथील बाजार समितीच्या छत्रपती संभाजी भाजीपाला आवार संकुलमधील कृषिपूरक व्यवसायाच्या गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बाजार समितींमधील अनेक निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आणि व्यापाºयांच्या सोईचे नव्हते. यामध्ये प्रामुख्याने शेतकºयाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शेतमाल विकला पाहिजे असा नियम होता. त्यामुळे शेतकºयांना सक्तीने बाजार समितीच्या आवारात शेतमाल विकावा लागत असल्याचे पाटील म्हणाले. आम्ही ही सक्ती काढली आहे, पणन मंत्री असताना शेतकºयाला सुरक्षित वाटेल त्या ठिकाणी माल विकू शकतो असा निर्णय घेतला. या निर्णयानुसार अनेक शेतकºयांचे गट एकत्र होऊन कंपनी स्थापन झाली आहे. या माध्यमातून शेतकरी ज्या ठिकाणी जास्त नफा वाटेल त्याठिकाणी शेतमाल विकत असल्याचे सांगत या निर्णयानंतर देखील मार्केटमधील आवक कमी झाली नसल्याचे पाटील म्हणाले.

बाजार समितीच्या आवारात शेतीपूरक वस्तू विकायच्या नाहीत असा देखील नियम होता; परंतु गेल्या पाच वर्षांत सरकारने लोकापयोगी निर्णय घेताना तत्काळ निर्णय घ्यायला सुरु वात केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील बाजार समितीमध्ये खूप बदल करण्याची आवश्यकता असून मार्केट वाढले पाहिजेत, सुविधा वाढल्या पाहिजेत, प्रामाणिक व्यवहार, शेतकºयांच्या शेतमालाला योग्य दर, शेतकºयांना वेळेत पैसे मिळाले पाहिजे असल्याचे पाटील म्हणाले. यासाठी राज्यातील शासकीय आणि खासगी बाजार समित्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले. आमदार मंदा म्हात्रे यांनी सदर मार्केटमध्ये कृषिपूरक व्यवसाय सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता.

पाठपुराव्याला यश आल्याने आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. भाजी मार्केटची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून मार्केटची सर्व सोयी-सुविधांयुक्त बांधणी करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारण्यात यावे त्यामुळे शेतकºयांच्या शेतमालाला देखील चांगला दर मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हात्रे म्हणाल्या. या वेळी बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, माथाडी नेते नरेंद्र पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील आदी मान्यवर, कृषी उत्पन्न व्यापारी वेलफेयर असोसिएशनचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.मला युतीविषयी बोलण्याचा अधिकारच्लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा फॉर्म्युला ठरवला आहे. त्या वेळी झालेल्या बैठकीला मी नव्हतो. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून याबाबत बोलण्याचा अधिकार मला असून युती बाबत निर्णय ते ते तिघे घेतील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.पूरग्रस्तांना सामाजिक मदत करण्याचे आवाहनच्पूरग्रस्तांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आपदा नावाने खाते उघडले असून, भाजपच्या लोकप्रतिनिधींना एक महिन्याचे वेतन जमा करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले. जमा होणाºया पैशातून पूरग्रस्त भागातील १०० गावांमधील शाळांची दुरु स्ती केली जाणार आहे. कोल्हापूर अंबाबाई देवस्थानच्या माध्यमातून १०० गावांमधील मंदिरांची दुरु स्ती आणि सुविधांची कामे केली जाणार असून, अशा प्रकारे १०० गावांसाठी व्यापाºयांनीही सामाजिक मदत करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.