शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

यश मिळविण्यासाठी संयम आवश्यक : निरूपणकार सचिन धर्माधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:32 IST

प्रत्येक तरुणाने त्याच्या गरजेनुसार नोकरी अथवा व्यवसाय निवडायला हवा, तर निवडलेल्या नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी संयम, चिकाटी व अभ्यासू वृत्तीची नितांत गरज असल्याचे मनोगत निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रविवारी वाशी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

नवी मुंबई : प्रत्येक तरुणाने त्याच्या गरजेनुसार नोकरी अथवा व्यवसाय निवडायला हवा, तर निवडलेल्या नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी संयम, चिकाटी व अभ्यासू वृत्तीची नितांत गरज असल्याचे मनोगत निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रविवारी वाशी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तरुणांना व्यवसाय क्षेत्रात मार्गदर्शन केल्याप्रकरणी निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांना ‘नवउद्योग निर्माण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाशीत रंगलेल्या या सत्कार सोहळ्यास श्री सदस्यांची अलोट गर्दी जमली होती.तरुणांना उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना ‘नवउद्योग निर्माण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाशीत झालेल्या या सोहळ्यासाठी नवी मुंबईसह मुंबई, पनवेल, उरण, ठाणे परिसरातील श्री सदस्यांनी गर्दी केली होती. श्री सदस्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याची भावना निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने आपली बुद्धी अपडेट करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासू वृत्ती संपली की व्यक्ती अंधश्रद्धेकडे वळते. त्यामुळे अज्ञान धुडकारून गंडे, दोरे, ताईत यातून प्रत्येकाने बाहेर येण्याचीही गरज असल्याचेही मार्गदर्शन सचिन धर्माधिकारी यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्टÑभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला जगण्याची योग्य दिशा दाखवल्याचे गौरवोद्गार काढले. या कुटुंबात सचिन धर्माधिकारी यांच्यासारखे दीपस्तंभ निर्माण होत असल्याचाही आनंद त्यांनी व्यक्त केला. या वेळी कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे, निरूपणकार राहुल धर्माधिकारी, आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको - उद्धव ठाकरेकोकणात विकासाची बुलेट ट्रेन आल्यावर तिथले निसर्गसौंदर्य आहे तसे राहील का, असे प्रश्नचिन्ह शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहे. वाशीतील ग्लोबल कोकण महोत्सवास ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी आयुष्याची राखरांगोळी करतील असे प्रकल्प कोकणात नको असल्याचे सांगत मेक इन इंडियाच्या माध्यमातून येणाºया काही प्रकल्पांना विरोध दर्शवला. कोकणच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यासाठी वाशीत ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी कोकण हा शिवसेनेचा कणा असल्याने, कोकणच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर काढून सर्वांसोबत येण्याची ग्वाही दिली. परंतु आयुष्याची राखरांगोळी करणारे प्रकल्प कोकणात येत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबईतले महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला पळवून वादग्रस्त प्रकल्प कोकणात आणले जात आहेत. त्यामुळे कोकणातील निसर्गाची हानी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विकासाचे स्वप्न साकारताना कोकणचे निसर्गसौंदर्यदेखील जोपासले जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत, आयुष्याची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको असल्याचे त्यांनी सुचवले. तसेच विकासाची बुलेट ट्रेन आल्यावर कोकणचे निसर्गसौंदर्य टिकेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोकणचा फायदा होईल असेच उद्योग-व्यवसाय तेथे आले पाहिजेत, परंतु त्यामध्ये कामगारवर्ग बाहेरचा असल्यास शिवसेना खपवून घेणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. या वेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही कोकणचा विकास करताना तिथले निसर्गसौंदर्य जपण्याची गरज व्यक्त केली. त्यानुसार नेमक्या कोणत्या पद्धतीने कोकणचा विकास केला जाऊ शकतो, त्यावर अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एक संस्था नेमली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.