शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:50 IST

महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे

आविष्कार देसाईअलिबाग : महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे; परंतु जनतेच्या हितासाठी छेडलेली आंदोलने सुट्टीच्या दिवशी आणि आलिशान वाहनांतून झाली, तर त्या आंदोलनाचे गांभीर्य राहत नाही. जनतेच्या मनातील खदखदत्या प्रश्नांना भिडण्यासाठी आंदोलने रस्त्यावर उतरून करावी लागतात. याचा विसर आंदोलकांना होणे म्हणजेच त्यांची जनतेसोबतची नाळ तुटल्याचे लक्षण म्हणणे योग्य ठरू शकते. याचाच प्रत्यय जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनाच्या बाबतीत दिसून येत आहे.केंद्रातील आणि राज्यातील तत्कालीन सरकारला सत्तेच्या खुर्चीतून खाली खेचण्यासाठी भाजपाने यातील बहुतांश मुद्द्यांचा आधार घेतला होता. हेच मुद्दे भाजपासाठी ‘गेम चेंजर’ ठरले होते आणि हेच मुद्दे आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अन्य विरोधी पक्षात असलेल्यांसाठीही ‘गेम चेंजर’ ठरू शकतात. मात्र, विरोधी पक्षाने ते अद्याप गंभीरतापूर्वक घेतल्याचे ते करीत असलेल्या आंदोलनातून दिसून येत नाही. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी सुट्टीच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीसाठी ‘एल्गार आंदोलन’ छेडले होेते. जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरावीक पदाधिकाºयांव्यतिरिक्त फारसे कोणीच नव्हते. पदाधिकाºयांनाही काही तास अगोदरच आंदोलनाची माहिती देण्यात आली होती. प्रदेश कार्यालयाने आंदोलनाची रूपरेषा आधीच निश्चित केल्याचे प्रमोद घोसाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जनेतेच्या प्रश्नांसाठीच हे आंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १ आॅक्टोबर रोजी रविवार आहे आणि त्या दिवशी कार्यालयीन सुट्टी असते, याची माहिती नियोजन करणाºयांना नव्हती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते तेही सुट्टीच्याच दिवशी होते. राष्ट्रवादी काँग्रेसला खरेच जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे, तर अशी लपून-छपून आंदोलने करण्याची गरज काय? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयातून आंदोलक दुपारी १२ वाजता वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्या वेळी त्यांच्यासोबत ना सर्वसामान्य जनता होती ना त्यांचे आंदोलन जनतेनेही पाहिले. रविवार सुट्टी असल्याने रस्त्यासह कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. जिल्हा प्रशासनास विनंती करून निवेदन घेण्यासाठी कोणीतरी अधिकारी उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली होती.सुट्टीच्या दिवशी त्या अधिकाºयाला सकाळपासून कार्यालयात उपस्थित राहावे लागले. त्यांच्या सुट्टीचा खोळंबा केला तो वेगळाच. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले.रविवार सुट्टी असल्याने जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल विभागाचे तहसीलदार, यांच्यासह अन्य अधिकारी कार्यालयात नव्हते.त्यामुळे निवेदन स्वीकारण्यास कोणीच नसल्याने जिल्हाध्यक्ष अर्ध्या रस्त्यातून मागे फिरत होते.मात्र, कार्यकर्त्यांनी आग्रह करून कोणताही अधिकारी निवेदन घेण्यापुरता उभा करावा, अशी मागणी केल्याचे समजते.राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकार विरोधात मोर्चा१कर्जत : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रविवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून एल्गार आंदोलन केले. कर्जतमधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, शेतकºयांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज तातडीने देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन केले होते.२लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातून निघालेला मोर्चा बाजारपेठेतून शिवाजी पुतळा मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. त्याठिकाणी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी अच्छे दिन आयेंगे, असा वादा करून भाजपा सरकार सत्तेत आले आणि त्यांनी तीन वर्षांत जनतेची दिशाभूल, फसवणूक केली आहे. सरकारच्या निष्क्र ीयतेमुळेच मुंबई एल्फिस्टन रेल्वेस्थानकात माणसाचा जीव गेला, त्याला सर्वस्वी हेच सरकार जबाबदार आहे. केंद आणि राज्य सरकारने जी आश्वासने निवडणुकीपूर्वी दिली ती तीन वर्षांत पूर्ण करू शकले नाहीत. ३या सरकारने शेतकºयांच्या हिताचे एकही पाऊल उचलले नाही, अशा शब्दांत खरपूस समाचार घेत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हा आजचा ट्रेलर होता अजून खूप बाकी आहे. आम्ही जनतेच्या हिताच्या मागण्या करत आहोत त्या पूर्ण झाल्या नाहीतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही या वेळी त्यांनी दिला. या वेळी आमदार सुरेश लाड, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते. या यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. 

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी