शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

राष्ट्रवादीचा आयुक्तांवर ‘हुकूमशाही’चा आरोप

By admin | Updated: August 21, 2016 07:06 IST

महापालिकेमध्ये आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. लोकप्रतिनिधींना वेळ दिला जात नाही. अधिकारी - कर्मचारी दहशतीखाली वावरत असून, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा

- नामदेव मोरे, नवी मुंबई

महापालिकेमध्ये आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. लोकप्रतिनिधींना वेळ दिला जात नाही. अधिकारी - कर्मचारी दहशतीखाली वावरत असून, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसने दिला आहे. परंतु शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना असे आरोप करणे शोभत नसल्याचा पलटवार केला आहे. २० वर्षे राष्ट्रवादीचीच हुकूमशाही सुरू होती. विरोधकांचे प्रस्ताव फेटाळले जात होते, असा आरोप केला आहे. यामुळे आता महापालिकेमध्ये नक्की हुकूमशाही कोणाची? याची चर्चा सुरू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाला मार्बल लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा करताना बहुतांश नगरसेवकांनी आयुक्तांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही पालिकेमध्ये आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. आतापर्यंत एकदाही आयुक्त भेटण्यासाठी आलेले नाहीत. आंबेडकर भवनविषयी त्यांना दिलेल्या पत्राचे साधे उत्तरही दिलेले नाही. शहरहितासाठी आम्ही काहीही बोललो नसलो तरी अशा प्रकारची मनमानी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आनंद सुतार यांनीही आयुक्तांच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली. अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. दहशतीखाली काम करत आहेत. राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. कधी कोण निलंबित होईल याचा नियम राहिलेला नाही. लोकप्रतिनिधींनी फोन केला तरी बोलण्याची भीती वाटत आहे. ‘वॉक वुईथ कमिशनर’ राबविणारे लोकप्रतिनिधींना भेटत नाहीत. यामुळे वॉक नाही ‘शॉक वुईथ कमिशनर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. अधिकारी थकल्यासारखे वाटत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तहकूब सभेमध्येही पाणी प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. सभेला आयुक्त नसल्याचे कारण देऊन सभा तहकूब केली. आयुक्तांची मनमानी थांबविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने केलेल्या आरोपांवर आयुक्तांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी शिवसेनेने मात्र असे आरोप सत्ताधाऱ्यांना शोभत नसल्याची टीका केली आहे. आयुक्तांनी तीन महिन्यांमध्ये केलेले कामकाज हुकूमशाही पद्धतीचे असेल तर २० वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांच्या प्रभागातील प्रस्ताव फेटाळणे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील प्रस्ताव विषय पत्रिकेवरच न घेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. फोर्टीज, हिरानंदानीसह अनेक विषयांवर विरोधी पक्षांनी केलेल्या सूचना फेटाळून प्रस्ताव मंजूर केले. यामुळे शहराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या बळावर त्यांना हवे तसे प्रस्ताव मंजूर केले. यामुळे जवळपास प्रत्येक सभेत जमिनीवर बसण्यापासून सभात्याग करण्याची वेळ विरोधी पक्षांवर आली. आयुक्त करतात ती हुकूमशाही; मग २० वर्षे तुम्ही केली त्याला काय म्हणायचे, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आयुक्तांवर घेण्यात आलेले आक्षेप - लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ दिली जात नाही- अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला- कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार - महासभेच्या अधिकारावर गदा आणली जात आहे- अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न - प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप - पावसाळ्यामध्येही पाणीकपात करून जनतेला वेठीस धरलेसत्ताधाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप -वीस वर्षे महापालिकेमध्ये हुकूमशाही पद्धतीने कामकाज -विरोधकांच्या प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव फेटाळले-प्रस्तावांवर विरोधी पक्षांनी मांडलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष -बहुमताच्या जोरावर हवे तसे व हवे तेच प्रस्ताव मंजूर -विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न -अनावश्यक गोष्टींवर करोडो रुपयांचा खर्च -प्रभाग समित्यांच्या रचनांमध्ये फेरफार -महत्त्वाचे सर्व प्रस्ताव आयत्यावेळी केले सादर दादावर दादागिरी आयुक्त हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत आहेत. नवी मुंबईच्या दादावर दादागिरी करत असून, ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आनंद सुतार यांनी सभागृहात दिला. आतापर्यंत नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक हे समीकरण झाले होते. परंतु तीन महिन्यांमध्ये शहरात फक्त तुकाराम मुंढे यांच्याच नावाची चर्चा असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.दोन दशके काय केले?महापालिकेमध्ये दोन दशकांपासून राष्ट्रवादीची हुकूमशाही सुरू आहे. प्रशासनामध्ये कोणाचा हस्तक्षेप असायचा, अधिकाऱ्यांना फाईल घेऊन कुठे जावे लागत होते, असा प्रश्न विरोधकांनी व्यक्त केला आहे. तीन महिन्यांत आयुक्त हुकूमशहा झाले; मग वीस वर्षे तुम्ही कोण होता, असा प्रश्न उपस्थित केला आहे.