शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नवी मुंबईचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के, यंदाही मुलीच अव्वल; शाळांनी राखली यशाची परंपरा

By योगेश पिंगळे | Updated: May 27, 2024 17:05 IST

यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी जाहीर झाला. नवी मुंबई शहराचा निकाल ९७.४५ टक्के इतका लागला आहे. यात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलीच अव्वल ठरल्या आहेत. शहरातील अनेक शाळांनी आपली यशाची परंपरा निकालातून यंदाही कायम राखली आहे. यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

राज्यभरात १ मार्च ते २६ मार्च २०२४ यादरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेला शहरातील १४३ शाळांच्या माध्यमातून १५ हजार ६३६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामधील १५ हजार २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा शहरातील तब्बल ५७ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. काही दिवसांपूर्वीच बारावीचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली होती. सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यावर निकालाच्या सर्व वेबसाइट काही वेळ संथगतीने सुरू होत्या. निकाल कळल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांसोबत आनंद व्यक्त केला.

पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६० टक्के....

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला शहरातून ९१० पुन:परीक्षार्थी विद्यार्थी सामोरे गेले होते. यामधील ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६०.८७ टक्के इतका लागला आहे.

समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव....

दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विविध व्हॉट्सॲप ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अनेकांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निकटवर्तीयांचे फोटो, निकालाची प्रत व्हॉट्सॲपच्या स्टेट्सला ठेवले होते.

दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लावला जातो. यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच निकाल लावणे हे या निकालाचे वैशिष्ट्य असून, याकामी सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. मुंबई विभागाचा निकाल चांगला लागला असून अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा जोमाने चांगला अभ्यास करून जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे, असंडॉ. सुभाष बोरसे, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEducationशिक्षण