शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

वाहतूककोंडीतून नवी मुंबईकरांची होणार सुटका; उड्डाणपुलांसह महामार्गांना आर्म ब्रिजने जोडणार

By नारायण जाधव | Updated: February 20, 2024 19:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क,  नवी मुंबई : टीसीसी औद्योगिक वसाहत, एपीएमसी मार्केटसह वाढते नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणारे डेटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : टीसीसी औद्योगिक वसाहत, एपीएमसी मार्केटसह वाढते नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणारे डेटा सेंटरचे जाळे यामुळे नवी मुुंबई महापालिका क्षेत्रात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरांतून जाणारे महामार्ग आणि बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर रेाजच वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने येत्या वर्षात रस्त्यांची नवी कामे घेतल्याने शहरवासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.वाशी, सेक्टर १७ पामबीच मार्गावर सायन पनवेल महामार्गावर २९० मीटर लांब व ६.५० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचून इंधनाचीही बचत होणार आहे.ऐरोली विभागातील मध्यवर्ती नाल्यावरील बसडेपो, सेक्टर ३, श्रीराम स्कूल, सेक्टर १९ लगतच्या एकूण ४ कल्व्हर्टची पुनर्बांधणी, दुरुस्ती व सुधारणा प्रस्तावित आहे.महापे उड्डाण आर्म : महापे उड्डाणपुलावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म बांधण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून त्या कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत.बेलापूर विभागातील आम्रमार्ग ते से. ११, १५, दिवाळेगांवमार्गे सायन –पनवेल महामार्गाला जोडण्यासाठी पूल आणि नेरूळ फेज -१ सेक्टर २१ ते सेक्टर २८ जोडण्याकरिता पुलाच्या कामाचा व्यवहार्यता अहवाल तयार केला असून त्याकरिता रक्कम २२० कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच त्यापैकी ५० खर्चाची सिडकोकडे मागणी केलेली आहे......तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी मार्ग बांधण्याकरिता यासंबंधी तांत्रिक व वित्तीय अहवाल तयार केला असून त्यामध्ये सल्फर कंपनीची ९ मीटर जागा संपादित करावी लागत असल्याने त्यामध्ये बदल करून ठाणे-बेलापूर रस्त्यावरून सायन पनवेल ब्रिजवर आर्म उभारणे प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार असून यासाठी १२६ कोटी खर्च अपेक्षित असून एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली.........कोपरखैरणे व घणसोली या नोडमधील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरुन महापे पुलापासून ते घणसोली येथील पामबीचपर्यंत पूल बांधणे (दुसरे आर्म) आवश्यक असल्याने त्याकरिता ४ हजार चौ.मी. भूखंडाची मागणी एमआयडीसीकडे केलेली आहे................घणसोली-ऐरोली खाडीपुलासह रस्त्याचा खर्च १६८ कोटींनी वाढलाघणसोली-ऐरोली खाडीपूल व रस्ता : मागील १५ वर्षे प्रलंबित असलेल्या घणसोली रस्ता व ऐरोलीला जोडणारा खाडी पूल बांधण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन केले आहे. नव्या नियोजनात १.९५ कि.मी. ऐवजी ३.४७ कि.मी. चा रस्ता व खाडी पूल बांधून हा रस्ता काटई -ऐरोली रस्त्याला जोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून या प्रकल्पाचा खर्च ३७२ कोटी ऐवजी ५४० कोटी अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या बांधकाम खर्चापैकी ५० टक्के खर्च म्हणजे २७० कोटी रक्कम सिडको देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची निविदा काढली असून, एप्रिल २०२४ अखेरपर्यंत कामास सुरुवात करण्यात येईल. या रस्त्यासह खाडी पुलामुळे घणसोलीकडून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे व मुलुंडमार्गे मुंबईकडे जाणे-येणे सोयीचे होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका