शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: आर्थिक वादातून तरुणाचे केले अपहरण, पोलिसांनी नागपूरमधून केली तरुणाची सुटका 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 19, 2024 23:22 IST

Navi Mumbai Crime News: टॅटो काढण्यासाठी डोंबिवली येथून कोपर खैरणेत आलेल्या तरुणाच्या अपहरणाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अपहरण झालेल्या तरुणाची नागपूरमधून सुटका केली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

नवी मुंबई  - टॅटो काढण्यासाठी डोंबिवली येथून कोपर खैरणेत आलेल्या तरुणाच्या अपहरणाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अपहरण झालेल्या तरुणाची नागपूरमधून सुटका केली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

डोंबिवलीच्या पलावा येथे राहणाऱ्या आदित्य तिवारी (२२) याचे रविवारी कोपर खैरणेतून अपहरण झाले होते. रविवारी दुपारी तो दोन मित्रांसह कोपर खैरणे सेक्टर ८ येथे टॅटो काढण्यासाठी आला होता. यावेळी अगोदरच तिथे असलेल्या एकाने आदित्य तिवारीला धमकावून कारमध्ये बसवून घेऊन गेले होते. त्यानंतर मात्र त्याच्याशी संपर्क न झाल्याने मित्रांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षानेही तपासाला सुरवात केली होती. त्यासाठी सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी सहायक निरीक्षक हर्षल कदम, श्रीनिवास तुंगेनवार, शशिकांत पवार, उपनिरीक्षक संजय रेड्डी, हवालदार निलेश किंद्रे, अनिल यादव, महेश पाटील व सतीश चव्हाण आदींचे पथक केले होते. त्यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्हीद्वारे दोन कारचा नंबर मिळवला होता. त्यानुसार तांत्रिक तपास व कारचा सुगावा घेऊन अपहरणाचा कट रचणाऱ्या दोघानं ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांकडे तिवारी याला डांबून ठेवले होते. मात्र दोन साथीदार पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच ते तिघेही पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक करून अपहरण झालेल्या आदित्य तिवारीची सुटका केली. आदित्य व दोन प्रमुख अपहरणकर्ते यांच्यात जुनी ओळख असून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होते. मार्केटिंग कंपन्यांवरून हा वाद असल्याचे देखील समजते. यातून त्यांनी आदित्यवर पाळत ठेवून अपहरणाचा कट रचला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई