शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Navi Mumbai: एपीएमसी संचालक मंडळास आग दुर्घटनेच्या अहवालाची प्रतीक्षा, दहा महिने उलटले

By नारायण जाधव | Updated: August 23, 2023 16:55 IST

Navi Mumbai: नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही.

- नारायण जाधवनवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही. यादरम्यान बाजार समितीच्या इतर बाजारपेठांतही आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे एपीएमसी प्रशासन फळ बाजारात लागलेल्या आगीचा अहवाल कधी सादर करणार, याची प्रतीक्षा संचालक मंडळास लागून राहिली आहे. त्यातच संचालक अपात्रतेच्या राजकारणामुळे संचालक मंडळाच्या बैठकीवर वारंवार विरजण पडले असून, ते प्रशासनाच्या पथ्यावरच पडले आहे.

फळ बाजारातील एका गाळ्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. शिवाय, बाजारपेठेतील अतिक्रमणांसह अग्निसुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला होता. अनेक व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने बांधकाम केले असून, मोकळ्या जागाही सोडल्या नाहीत. त्यातच आहेत त्या मोकळ्या जागांमध्ये पुठ्ठे, लाकडी खोक्यांसह काही ठिकाणी किरकोळ व्यवसायासाठी अतिक्रमण केले आहे. हा प्रकार केवळ फळ बाजारच नव्हे, तर भाजीपाला आणि मसाला, दाणाबंदरातही आहे. मागे सुक्यामेव्याच्या एका दुकानाला आग लागली होती.

समितीने किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली?फळ बाजारातील आगीनंतर एपीएमसी प्रशासनाने पाच बाजारांतील अधिकाऱ्यांची समिती गठित करून पाचही बाजारपेठांतील अग्निसुरक्षेसह इतर सुरक्षिततेच्या बाबतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या समितीने कोणत्या बाजारपेठांना कधी आणि किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली, काय उपाय सुचविले, त्या आगीची कारणे कोणती होती, याविषयीच्या अहवालाची संचालक मंडळास प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती