शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Navi Mumbai: एपीएमसी संचालक मंडळास आग दुर्घटनेच्या अहवालाची प्रतीक्षा, दहा महिने उलटले

By नारायण जाधव | Updated: August 23, 2023 16:55 IST

Navi Mumbai: नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही.

- नारायण जाधवनवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही. यादरम्यान बाजार समितीच्या इतर बाजारपेठांतही आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे एपीएमसी प्रशासन फळ बाजारात लागलेल्या आगीचा अहवाल कधी सादर करणार, याची प्रतीक्षा संचालक मंडळास लागून राहिली आहे. त्यातच संचालक अपात्रतेच्या राजकारणामुळे संचालक मंडळाच्या बैठकीवर वारंवार विरजण पडले असून, ते प्रशासनाच्या पथ्यावरच पडले आहे.

फळ बाजारातील एका गाळ्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. शिवाय, बाजारपेठेतील अतिक्रमणांसह अग्निसुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला होता. अनेक व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने बांधकाम केले असून, मोकळ्या जागाही सोडल्या नाहीत. त्यातच आहेत त्या मोकळ्या जागांमध्ये पुठ्ठे, लाकडी खोक्यांसह काही ठिकाणी किरकोळ व्यवसायासाठी अतिक्रमण केले आहे. हा प्रकार केवळ फळ बाजारच नव्हे, तर भाजीपाला आणि मसाला, दाणाबंदरातही आहे. मागे सुक्यामेव्याच्या एका दुकानाला आग लागली होती.

समितीने किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली?फळ बाजारातील आगीनंतर एपीएमसी प्रशासनाने पाच बाजारांतील अधिकाऱ्यांची समिती गठित करून पाचही बाजारपेठांतील अग्निसुरक्षेसह इतर सुरक्षिततेच्या बाबतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या समितीने कोणत्या बाजारपेठांना कधी आणि किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली, काय उपाय सुचविले, त्या आगीची कारणे कोणती होती, याविषयीच्या अहवालाची संचालक मंडळास प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती