शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: एपीएमसी संचालक मंडळास आग दुर्घटनेच्या अहवालाची प्रतीक्षा, दहा महिने उलटले

By नारायण जाधव | Updated: August 23, 2023 16:55 IST

Navi Mumbai: नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही.

- नारायण जाधवनवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही. यादरम्यान बाजार समितीच्या इतर बाजारपेठांतही आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे एपीएमसी प्रशासन फळ बाजारात लागलेल्या आगीचा अहवाल कधी सादर करणार, याची प्रतीक्षा संचालक मंडळास लागून राहिली आहे. त्यातच संचालक अपात्रतेच्या राजकारणामुळे संचालक मंडळाच्या बैठकीवर वारंवार विरजण पडले असून, ते प्रशासनाच्या पथ्यावरच पडले आहे.

फळ बाजारातील एका गाळ्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. शिवाय, बाजारपेठेतील अतिक्रमणांसह अग्निसुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला होता. अनेक व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने बांधकाम केले असून, मोकळ्या जागाही सोडल्या नाहीत. त्यातच आहेत त्या मोकळ्या जागांमध्ये पुठ्ठे, लाकडी खोक्यांसह काही ठिकाणी किरकोळ व्यवसायासाठी अतिक्रमण केले आहे. हा प्रकार केवळ फळ बाजारच नव्हे, तर भाजीपाला आणि मसाला, दाणाबंदरातही आहे. मागे सुक्यामेव्याच्या एका दुकानाला आग लागली होती.

समितीने किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली?फळ बाजारातील आगीनंतर एपीएमसी प्रशासनाने पाच बाजारांतील अधिकाऱ्यांची समिती गठित करून पाचही बाजारपेठांतील अग्निसुरक्षेसह इतर सुरक्षिततेच्या बाबतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या समितीने कोणत्या बाजारपेठांना कधी आणि किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली, काय उपाय सुचविले, त्या आगीची कारणे कोणती होती, याविषयीच्या अहवालाची संचालक मंडळास प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती