शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी उतरले रस्त्यावर, केले मानवी साखळी आंदोलन

By नारायण जाधव | Updated: May 11, 2024 15:48 IST

Navi Mumbai News: शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमींनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा वाचवा, त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, डीपीएस तलाव वाचवा, असे फलक हातात घेऊन मूक मानवी साखळी उभारून आंदोलन केले.

- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबईतील पाम बीचवरील डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याची मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच अनुषंगाने शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमींनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा वाचवा, त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, डीपीएस तलाव वाचवा, असे फलक हातात घेऊन मूक मानवी साखळी उभारून आंदोलन केले.

#SaveDPSflamingoLake ची घोषणा करणारे एक मोठे बॅनर, फलक हातात घेऊन आंदोलकांनी फ्लेमिंगोंच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून आवाज उठवला.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्याने ३० एकरांचा डीपीएस तलाव कोरडा पडून धोक्यात आला आहे. नेरूळ जेट्टीच्या बांधकामामुळे या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह अडवला गेल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पाण्याचा प्रवाह रोखल्याने फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात इतरत्र भरकटत असल्याने आतापर्यंत १० हून अधिक फ्लेमिंगो मरण पावले असून पाच जखमी झाले असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच मुख्यमंत्र्यांनी नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देऊन तलावातील पाणी अडवण्याच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. परंतु, अद्याप जमिनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे कुमार म्हणाले. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन म्हणाले की, उल्लंघन हे न्यायालयाच्या अवमान असून या संदर्भात आमची संस्था वकिलांशी सल्लामसलत करत आहे. सिडको-वन अधिकाऱ्यांवर कारवाई हवीसेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज फोरमच्या अंजली अग्रवाल म्हणाल्या, “वास्तविक, आम्हाला आशा आहे की, महानगरपालिका, सिडको आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या संकटाचा आढावा घेण्यासाठी या तलावाला भेट दिल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईल.’’ सिडकोचे अधिकारी इतके निर्दयी आणि बेजबाबदार कसे असू शकतात, असा प्रश्न पारसिक ग्रीन्सचे विष्णू जोशी यांनी केला. बेलापूरचे कार्यकर्ते हेमंत काटकर यांनी खंत व्यक्त करून लोकांनी रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी जबाबदार धरले पाहिजे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई