शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी उतरले रस्त्यावर, केले मानवी साखळी आंदोलन

By नारायण जाधव | Updated: May 11, 2024 15:48 IST

Navi Mumbai News: शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमींनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा वाचवा, त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, डीपीएस तलाव वाचवा, असे फलक हातात घेऊन मूक मानवी साखळी उभारून आंदोलन केले.

- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबईतील पाम बीचवरील डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याची मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच अनुषंगाने शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमींनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा वाचवा, त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, डीपीएस तलाव वाचवा, असे फलक हातात घेऊन मूक मानवी साखळी उभारून आंदोलन केले.

#SaveDPSflamingoLake ची घोषणा करणारे एक मोठे बॅनर, फलक हातात घेऊन आंदोलकांनी फ्लेमिंगोंच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून आवाज उठवला.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्याने ३० एकरांचा डीपीएस तलाव कोरडा पडून धोक्यात आला आहे. नेरूळ जेट्टीच्या बांधकामामुळे या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह अडवला गेल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पाण्याचा प्रवाह रोखल्याने फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात इतरत्र भरकटत असल्याने आतापर्यंत १० हून अधिक फ्लेमिंगो मरण पावले असून पाच जखमी झाले असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच मुख्यमंत्र्यांनी नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देऊन तलावातील पाणी अडवण्याच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. परंतु, अद्याप जमिनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे कुमार म्हणाले. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन म्हणाले की, उल्लंघन हे न्यायालयाच्या अवमान असून या संदर्भात आमची संस्था वकिलांशी सल्लामसलत करत आहे. सिडको-वन अधिकाऱ्यांवर कारवाई हवीसेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज फोरमच्या अंजली अग्रवाल म्हणाल्या, “वास्तविक, आम्हाला आशा आहे की, महानगरपालिका, सिडको आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या संकटाचा आढावा घेण्यासाठी या तलावाला भेट दिल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईल.’’ सिडकोचे अधिकारी इतके निर्दयी आणि बेजबाबदार कसे असू शकतात, असा प्रश्न पारसिक ग्रीन्सचे विष्णू जोशी यांनी केला. बेलापूरचे कार्यकर्ते हेमंत काटकर यांनी खंत व्यक्त करून लोकांनी रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी जबाबदार धरले पाहिजे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई