शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

नवी मुंबई, पनवेल, उरणकरांचा कोरोनाशी लढा; आठ महिन्यांत ८५ हजार रुग्ण मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 23:43 IST

स्वच्छता स्पर्धेत देशात ठसा, मेट्रोसह विमानउड्डाणाचा मुहूर्त लांबणीवर

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनामुळे नवी मुंबई, पनवेलसह उरण परिसरातील विकासाचे नियोजन वर्षभर कोलमडले. तिन्ही शहरांमध्ये आतापर्यंत तब्बल ८८ हजार रुग्ण आढळले असून, त्यामधील ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त करण्यात यश आले. मावळत्या वर्षात मेट्रोसह विमानउड्डाणाचा मुहूर्त लांबणीवर पडला. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची गती मंदावली. औद्योगिक वसाहतीलाही मोठा आर्थिक फटका बसला असला, तरी वर्षभरात अनेक सकारात्मक घटना घडल्या. नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक आला. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे. 

चौथा खाडीपूल?कोरोना काळात अनेक विकास कामे धिम्या गतीने सुरू असताना शासनाने चौथ्या खाडीपुलाच्या बांधकामाला परवानगी दिल्यामुळे विकासाला नवीन दिशा मिळाली आहे. वाशी ते मानखुर्ददरम्यान तिसऱ्या खाडीपुलाला लागून नवीन पुलाचे बांधकाम होणार आहे. यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी पूर्णपणे थांबणार आहे. मावळत्या वर्षात नवी मुंबईकरांसाठी हा सर्वात सकारात्मक निर्णय ठरणार आहे.

एपीएमसीत धान्यपुरवठा सुरळीतमार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सर्व जनजीवन ठप्प झाले हाेते. मुंबईसह नवी मुंबईमधील दीड कोटी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक संकटांशी सामाना करत सुरळीतपणे धान्यपुरवठा सुरू ठेवला. तेथील अनेक कामगारांना लागण झाली. मात्र त्यावर मात करीत काम सुरू ठेवले. समितीच्या या कामाचे शासनानेही कौतुक केले आहे.

प्रकल्पांची रखडपट्टीनवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन फेब्रुवारी, २०१८ मध्ये झाले. तेव्हा विमानाचे पहिले उड्डाण २०२० मध्ये होणार असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु दोन वर्षांनंतरही सपाटीकरण व इतर कामेच सुरू आहेत. मेट्रो रेल्वेचा मुहूर्तही चुकला आहे. घणसोलीमधील आंतरराष्ट्रीय स्टेडियम, नवीन मलनिस्सारण वाहिनी व इतर महत्त्वाची कामे होऊ शकली नाहीत. कोरोना नियंत्रणासाठीचा खर्च वाढल्यामुळे व उत्पन्न घटल्याने अत्यावश्यकसेवा वगळून इतर विकासकामांना कात्री लावावी लागली.

पोलिसांचे काम कौतुकास्पदकोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात दिवसरात्र बंदोबस्त ठेवलाच, याशिवाय परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठीची चोख व्यवस्था केली. मजुरांना धान्यपुरवठा करण्यासह विविध प्रकारची सामाजिक कामेही पोलिसांनी केली. गत वर्षीच्या तुलनेमध्ये २०२० मध्ये गुन्ह्यांची संख्या कमी करण्यातही यश मिळविले. पोलिसांनी केलेल्या कामाचे शहरवासीयांनी कौतुक केले आहे.

कोरोनामुक्तीला पालिकांचे प्रथम प्राधान्यनवी मुंबईसह पनवेलमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व या परिसरातील विकासाचे सर्व नियोजन कोलमडले. दोन्ही महानगरपालिका ग्रामीण परिसर व उरणमध्ये दहा महिन्यांत कोरोनाचे तब्बल ८८ हजार रुग्ण सापडले. आतापर्यंत १,९०६ जणांचा मृत्यू झाला असून, ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. वर्षअखेरीस तीन शहरांमध्ये फक्त १,३६७ रुग्ण शिल्लक आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देताना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून, नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. संपूर्ण वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास द्यावा लागला.

पाचही प्रशासकीय प्रमुखांची बदली

नवी मुंबई पनवेल परिसरातील पाचही प्रमुख अस्थापनांच्या प्रमुखांची वर्षभरात बदली करण्यात आली. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या कोकण भवनमधील विभागीय आयुक्त शिवाजी दाैंड निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागेवर अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. सिडिकाेचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची बदली होऊन संजय मुखर्जी यांची वर्णी लागली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस आयुक्त पदाचीही खांदेपालट झाली आहे. संजय कुमार यांच्या जागेवर बीपीनकुमार सिंग यांची नियुक्ती झाली आहे. कोरोनाच्या काळात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर सुधाकर देशमुख यांची वर्णी लागली आहे. पहिल्यांदाच पाच प्रमुखांची एकाच वर्षात बदली झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई