शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नवी मुंबई ते पंढरपूर अनोखी सायकल वारी; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 19:52 IST

आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे .

- वैभव गायकर

पनवेल : आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे . शुक्रवारी नवी मुंबईमधून देखील सायकलस्वार पर्यावरण बचावाचा संदेश  देत  सुमारे ३५० किमीचा प्रवास गाठण्यासाठी सज्ज झाले. खारघर मधून सहा जण पंढरपूर कडे रवाना झाले .            झाडे लावा पार्यावरण वाचवा हा संदेश दहा सायकल स्वार पंढरपूर कडे रवाना झाले असून या तरुणांमध्ये पोलीस, वकील तसेच डॉक्टर या उच्चशिक्षित अधिका-यांचा समावेश आहे . शुक्रवारी सकाळी सहा वाजता खारघर येथून सहा जणांचा पथक पंढरपूर कडे रवाना झाला . यामध्ये डॉ अमर भिडे , लाचलुचपत विभागातील कन्हैया थोरात , रवींद्र क्षीरसागर, बाळासाहेब सावंत, अंकुश बांगर, वाल्मिक पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निलेश थोटे , पोलीस हवालदार गणेश पवार , अनिल गीते , मिलिंद सकपाळ आदींचा समावेश आहे . दहा जणांपैकी चार जण पुण्यात राहत असलयाने पुण्याहून या अनोख्या सायकल स्वारीत सहभागी होणार आहेत . मागील तीन वर्षपासून दहा जण या अनोख्या वारीचे आयोजन करत असतात . या प्रवासादरम्यान ग्रामस्थांमध्ये वृक्षलागवड , पर्यावरण संरक्षण , तसेच प्रकृती स्वास्थाचे धडे देणार आहेत . दोन दिवसात हा २५० किमीचा प्रवास हे दहा जण पार करणार आहेत . विशेष म्हणजे पंढरपूर ला स्थानापन्न झाल्यांनतर विठुरायाच्या चरणी पर्यावरण संरक्षणाची मागणी हे दहा जण करणार आहेत .       शासनाच्या विविध खात्यात काम करणारे उच्च पदस्थ अधिकारी , पोलीस अधिकारी , तसेच खाजगी क्षेत्रातील अधिकारी डॉक्टर यांचा व्यस्त कार्यकाळ सर्वानाच माहीत आहे . अशावेळी वेळात वेळ काढून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनोखी वारी करणा-या सर्वाचाच कौतुक केले जात आहे .

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई