शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नवी मुंबई : वर्षभरात ४५६१ गुन्हे, संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:23 IST

पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के झाले असून ते वाढविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नवी मुंबई : पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के झाले असून ते वाढविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सलग तीन वर्षे गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. २०१५ मध्ये ५४०५ गुन्हे दाखल झाले होते. २०१६ मध्ये ४८०१ व २०१७ मध्ये ही संख्या ४५६१ एवढी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये २४० गुन्हे कमी दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होण्याची संख्या कमी झाली ही दिलासादायक गोष्ट असली तरी गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण कमी होत असून ती पोलिसांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. २०१६ मध्ये विक्रमी ७४ टक्के गुन्ह्यांचा उलगडा झाला होता. न्यायालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही ६० टक्के असे राज्यात सर्वात जास्त होते. परंतु २०१७ मध्ये प्रकटीकरणाची टक्केवारी ६७ झाली आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.२०१६ च्या तुलनेमध्ये सोनसाखळीचे २६, घरफोडीचे ३९, चोरीचे ४६ व प्राणांतिक अपघाताचे ५७ गुन्हे कमी करण्यात यश आले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये दरोड्याचे ८ गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये बँक आॅफ बरोडा व वाशीतील व्यापाºयाच्या घरावर झालेल्या दरोड्याचाही समावेश आहे. सर्व ८ गुन्हे उघडकीस आले असून ६५ टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे.अमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे. १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २८ आरोपींना अटक केली आहे. तब्बल ५४ किलो ७४६ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. ४६५ ग्रॅम मेथाफेटामाईन हे केमिकल आंतरराज्य टोळीकडून जप्त केले आहे. पोलिसांनी वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ८ गुन्ह्यांमध्ये मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकूण ४६ आरोपींवर मोक्का लावला आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी २९ आरोपींना अटक केली आहे.सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्षवर्षभरामध्ये सायबर सेल मध्ये ९५८ जणांनी तक्रारी केल्या होत्या. ७२ गुन्हे दाखल झाले असून २६ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. एकूण १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.सायबर गुन्ह्यांमध्ये रिलायन्स कंपनी व जेएनपीटीमधील जीटीआय पोर्टमधील संगणक हॅक केल्याचा गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांचे संकेतस्थळही हॅक करण्यात आले होते.दोषी पोलिसांवर कारवाईकामात कुचराई करणाºयांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरामध्ये ७ कर्मचारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. ५ अधिकारी, कर्मचाºयांनाही बडतर्फ केले असून एका व्यक्तीला सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. याशिवाय ७ जणांना बडतर्फीसाठी, १५ जणांना सेवेतून काढून टाकण्याची व दोघांना सक्तीने निवृत्तीची कारवाई का करू नये अशी नोटीस दिली आहे. याशिवाय एकूण ६० जणांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी आॅपरेशन मुस्कानअंतर्गत चांगली कामगिरी केली आहे. १७ बालकांचा शोध घेतला आहे. ३ मुली व १७ महिलांची सुटका करून घेतली असून ३० आरोपींना अटक केली आहे.वाहतूक पोलिसांनी वर्षभरामध्ये ४,०५,८१६ केसेस करण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये २०,२९२ जास्त केसेस केल्या आहेत. मद्यप्राशन करणाºया ५८८ जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अपघात कमी करण्यात यश आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा