शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

नवी मुंबई महापालिकेचा ४०२० कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:26 IST

स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई : स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या अंदाजापेक्षा ही रक्कम तब्बल ५६३ कोटी रुपयांनी जास्त आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अनेक नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी १६ फेब्रुवारीला ३४५५ कोटी ६४ लाख रुपये किमतीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीमध्ये दोन दिवस या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये १७३ कोटी रुपयांची वाढ केली होती. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी ३६२९ कोटी ४४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक ५ मार्चला सर्वसाधारण सभेमध्ये सादर केले. सर्वसाधारण सभेमध्ये तीन दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली. वास्तविक सर्व सदस्य अर्थसंकल्पावर चर्चा करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात चर्चा करण्यामध्ये बहुतांश सदस्यांना रस नसल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी फक्त दोन सदस्यांना त्यांचे मत मांडला आले होते. बुधवारी झालेल्या सभेमध्ये २० सदस्यांनी चर्चा केली होती. गुरुवारी शेवटच्या दिवशी फक्त ७ सदस्यांनी चर्चा केली. सभागृहामध्ये निवडून आलेले १११ व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. यापैकी सर्वसाधारण सभेत २९ व स्थायी समितीमध्ये १३ जणांनी चर्चेत सहभाग घेतला होता. उर्वरित सदस्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजता सभेचे आयोजन केले होते, परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित नसल्यामुळे तब्बल सव्वातास उशिराने सभा सुरू झाली. सभा सुरू असतानाही अनेक सदस्य वारंवार सभागृहाच्या बाहेर जात होते. सायंकाळी अर्थसंकल्प मंजूर करतानाही जवळपास ५१ जण सदस्य उपस्थित होते. शिवसेना व भाजपाचे सदस्य कमी प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवकांच्या अनुपस्थितीमध्ये चर्चेतील अल्प सहभाग यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामधील कामांविषयी सूचना केल्या. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्यावतीने अंदाजपत्रकामध्ये वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले की, अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांनी केलेल्या मौलिक सूचना आयुक्तांना सादर केल्या जातील. शहरातील विकासकामांची हीच गती कायम ठेवून नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर दुर्गंधीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सदस्यांनी चर्चा केली असून भविष्यात समुद्राचे पाणी शहरात येऊ नये यासाठी झडपा असलेले नाले बनविणे गरजेचे आहे त्यासाठी शहरात नाला व्हिजन राबविणे महत्त्वाचे आहे. अर्थसंकल्प वास्तववादी असून कामांच्या गतीसाठी आयुक्तांनी अभियांत्रिकी विभाग सक्षम करावा असे स्पष्ट केले.>प्रशासनाची कसरतआयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजामध्ये तब्बल ५६३ कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पामध्ये केली आहे. वाढीव उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.>उत्पन्नासाठी सुचविलेली वाढ (खर्च कोटीमध्ये)विभाग स्थायीचे महासभेची अंतिमअंदाज वाढ उद्दिष्टरस्ते खोदाई शुल्क ३५ १० ४५मालमत्ता कर ६८५ १३९ ८२४नगररचना १९० १० २००स्थानिक संस्था कर ११८६ २५ १२११पाणीपुरवठा ९२ १५ १०७बाह्य रुग्ण शुल्क २ २ ४लोककला केंद्र अनुदान २३ ५ २८मोरबे धरण १८ १० २८>खर्चाची तरतूदकामाचे नाव तरतूदसंगणकीकरण ९.९०सीसीटीव्ही ७०पाणी निचरा सुधारणा ७५उड्डाणपूल बांधणे ७५अडथळामुक्त रस्ते पदपथ ३७६उद्याने २३.२५शाळा वर्गखोली बांधणे ५६.७२मंडई खुले गाळे बांधणे ३३.७६नवीन जलवाहिन्यांची कामे २७.१०नवीन जलकुंभ व उदंचन केंद्र २४.२९दवाखाने बांधणे २७.१६व्यायाामशाळा व विविध भवन ५५.२०मैदाने विकसित करणे २३.६१तलावांची सुधारणा १०.३६गावठाण मलनि:सारण योजना २०.५९नवीन पूल बांधणे ३३.३२स्मशानभूमी बांधणे १५.१४दिवाबत्ती सुधारणा १५.७५विद्युतवाहक तारा भूमिगत १०.८१परिवहन उपक्रम अनुदान १४०कंत्राटी कामगार वेतन थकबाकी ७०