शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेचा ४०२० कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:26 IST

स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई : स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या अंदाजापेक्षा ही रक्कम तब्बल ५६३ कोटी रुपयांनी जास्त आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अनेक नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी १६ फेब्रुवारीला ३४५५ कोटी ६४ लाख रुपये किमतीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीमध्ये दोन दिवस या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये १७३ कोटी रुपयांची वाढ केली होती. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी ३६२९ कोटी ४४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक ५ मार्चला सर्वसाधारण सभेमध्ये सादर केले. सर्वसाधारण सभेमध्ये तीन दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली. वास्तविक सर्व सदस्य अर्थसंकल्पावर चर्चा करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात चर्चा करण्यामध्ये बहुतांश सदस्यांना रस नसल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी फक्त दोन सदस्यांना त्यांचे मत मांडला आले होते. बुधवारी झालेल्या सभेमध्ये २० सदस्यांनी चर्चा केली होती. गुरुवारी शेवटच्या दिवशी फक्त ७ सदस्यांनी चर्चा केली. सभागृहामध्ये निवडून आलेले १११ व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. यापैकी सर्वसाधारण सभेत २९ व स्थायी समितीमध्ये १३ जणांनी चर्चेत सहभाग घेतला होता. उर्वरित सदस्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजता सभेचे आयोजन केले होते, परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित नसल्यामुळे तब्बल सव्वातास उशिराने सभा सुरू झाली. सभा सुरू असतानाही अनेक सदस्य वारंवार सभागृहाच्या बाहेर जात होते. सायंकाळी अर्थसंकल्प मंजूर करतानाही जवळपास ५१ जण सदस्य उपस्थित होते. शिवसेना व भाजपाचे सदस्य कमी प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवकांच्या अनुपस्थितीमध्ये चर्चेतील अल्प सहभाग यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामधील कामांविषयी सूचना केल्या. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्यावतीने अंदाजपत्रकामध्ये वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले की, अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांनी केलेल्या मौलिक सूचना आयुक्तांना सादर केल्या जातील. शहरातील विकासकामांची हीच गती कायम ठेवून नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर दुर्गंधीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सदस्यांनी चर्चा केली असून भविष्यात समुद्राचे पाणी शहरात येऊ नये यासाठी झडपा असलेले नाले बनविणे गरजेचे आहे त्यासाठी शहरात नाला व्हिजन राबविणे महत्त्वाचे आहे. अर्थसंकल्प वास्तववादी असून कामांच्या गतीसाठी आयुक्तांनी अभियांत्रिकी विभाग सक्षम करावा असे स्पष्ट केले.>प्रशासनाची कसरतआयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजामध्ये तब्बल ५६३ कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पामध्ये केली आहे. वाढीव उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.>उत्पन्नासाठी सुचविलेली वाढ (खर्च कोटीमध्ये)विभाग स्थायीचे महासभेची अंतिमअंदाज वाढ उद्दिष्टरस्ते खोदाई शुल्क ३५ १० ४५मालमत्ता कर ६८५ १३९ ८२४नगररचना १९० १० २००स्थानिक संस्था कर ११८६ २५ १२११पाणीपुरवठा ९२ १५ १०७बाह्य रुग्ण शुल्क २ २ ४लोककला केंद्र अनुदान २३ ५ २८मोरबे धरण १८ १० २८>खर्चाची तरतूदकामाचे नाव तरतूदसंगणकीकरण ९.९०सीसीटीव्ही ७०पाणी निचरा सुधारणा ७५उड्डाणपूल बांधणे ७५अडथळामुक्त रस्ते पदपथ ३७६उद्याने २३.२५शाळा वर्गखोली बांधणे ५६.७२मंडई खुले गाळे बांधणे ३३.७६नवीन जलवाहिन्यांची कामे २७.१०नवीन जलकुंभ व उदंचन केंद्र २४.२९दवाखाने बांधणे २७.१६व्यायाामशाळा व विविध भवन ५५.२०मैदाने विकसित करणे २३.६१तलावांची सुधारणा १०.३६गावठाण मलनि:सारण योजना २०.५९नवीन पूल बांधणे ३३.३२स्मशानभूमी बांधणे १५.१४दिवाबत्ती सुधारणा १५.७५विद्युतवाहक तारा भूमिगत १०.८१परिवहन उपक्रम अनुदान १४०कंत्राटी कामगार वेतन थकबाकी ७०