शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नवी मुंबई महापालिकेचा ४०२० कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:26 IST

स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई : स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या अंदाजापेक्षा ही रक्कम तब्बल ५६३ कोटी रुपयांनी जास्त आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अनेक नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी १६ फेब्रुवारीला ३४५५ कोटी ६४ लाख रुपये किमतीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीमध्ये दोन दिवस या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये १७३ कोटी रुपयांची वाढ केली होती. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी ३६२९ कोटी ४४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक ५ मार्चला सर्वसाधारण सभेमध्ये सादर केले. सर्वसाधारण सभेमध्ये तीन दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली. वास्तविक सर्व सदस्य अर्थसंकल्पावर चर्चा करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात चर्चा करण्यामध्ये बहुतांश सदस्यांना रस नसल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी फक्त दोन सदस्यांना त्यांचे मत मांडला आले होते. बुधवारी झालेल्या सभेमध्ये २० सदस्यांनी चर्चा केली होती. गुरुवारी शेवटच्या दिवशी फक्त ७ सदस्यांनी चर्चा केली. सभागृहामध्ये निवडून आलेले १११ व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. यापैकी सर्वसाधारण सभेत २९ व स्थायी समितीमध्ये १३ जणांनी चर्चेत सहभाग घेतला होता. उर्वरित सदस्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजता सभेचे आयोजन केले होते, परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित नसल्यामुळे तब्बल सव्वातास उशिराने सभा सुरू झाली. सभा सुरू असतानाही अनेक सदस्य वारंवार सभागृहाच्या बाहेर जात होते. सायंकाळी अर्थसंकल्प मंजूर करतानाही जवळपास ५१ जण सदस्य उपस्थित होते. शिवसेना व भाजपाचे सदस्य कमी प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवकांच्या अनुपस्थितीमध्ये चर्चेतील अल्प सहभाग यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामधील कामांविषयी सूचना केल्या. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्यावतीने अंदाजपत्रकामध्ये वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले की, अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांनी केलेल्या मौलिक सूचना आयुक्तांना सादर केल्या जातील. शहरातील विकासकामांची हीच गती कायम ठेवून नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर दुर्गंधीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सदस्यांनी चर्चा केली असून भविष्यात समुद्राचे पाणी शहरात येऊ नये यासाठी झडपा असलेले नाले बनविणे गरजेचे आहे त्यासाठी शहरात नाला व्हिजन राबविणे महत्त्वाचे आहे. अर्थसंकल्प वास्तववादी असून कामांच्या गतीसाठी आयुक्तांनी अभियांत्रिकी विभाग सक्षम करावा असे स्पष्ट केले.>प्रशासनाची कसरतआयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजामध्ये तब्बल ५६३ कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पामध्ये केली आहे. वाढीव उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.>उत्पन्नासाठी सुचविलेली वाढ (खर्च कोटीमध्ये)विभाग स्थायीचे महासभेची अंतिमअंदाज वाढ उद्दिष्टरस्ते खोदाई शुल्क ३५ १० ४५मालमत्ता कर ६८५ १३९ ८२४नगररचना १९० १० २००स्थानिक संस्था कर ११८६ २५ १२११पाणीपुरवठा ९२ १५ १०७बाह्य रुग्ण शुल्क २ २ ४लोककला केंद्र अनुदान २३ ५ २८मोरबे धरण १८ १० २८>खर्चाची तरतूदकामाचे नाव तरतूदसंगणकीकरण ९.९०सीसीटीव्ही ७०पाणी निचरा सुधारणा ७५उड्डाणपूल बांधणे ७५अडथळामुक्त रस्ते पदपथ ३७६उद्याने २३.२५शाळा वर्गखोली बांधणे ५६.७२मंडई खुले गाळे बांधणे ३३.७६नवीन जलवाहिन्यांची कामे २७.१०नवीन जलकुंभ व उदंचन केंद्र २४.२९दवाखाने बांधणे २७.१६व्यायाामशाळा व विविध भवन ५५.२०मैदाने विकसित करणे २३.६१तलावांची सुधारणा १०.३६गावठाण मलनि:सारण योजना २०.५९नवीन पूल बांधणे ३३.३२स्मशानभूमी बांधणे १५.१४दिवाबत्ती सुधारणा १५.७५विद्युतवाहक तारा भूमिगत १०.८१परिवहन उपक्रम अनुदान १४०कंत्राटी कामगार वेतन थकबाकी ७०