शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेस महापालिकेचा सुरुंग; भूखंडावर दाखविले ट्रक टर्मिनलचे आरक्षण

By नारायण जाधव | Updated: August 27, 2022 19:55 IST

महापालिकेने विकास आराखड्यात या भूखंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १२०० ट्रकसाठी टर्मिनल विकसित केल्याचे नमूद केले आहे.

नवी मुंबई : आपल्या बहुचर्चित प्रारूप विकास आराखड्यात नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर १९ येथील भूखंड क्र. १ या ६५ हजार २६४ चौरस मीटरच्या भूखंडावर ट्रक टर्मिनलचे आरक्षण दाखविले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याच भूखंडावर सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे काम सुरू आहे. मात्र, आता महापालिकेने त्यावर आरक्षण टाकल्याने सिडकोचा हा प्रकल्प अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.

महापालिकेने विकास आराखड्यात या भूखंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १२०० ट्रकसाठी टर्मिनल विकसित केल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर आणखी पाच हजार ट्रक पार्किंगसाठी नव्याने ट्रक टर्मिनल विकसित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.परंतु, सध्या या भूखंडावर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तीन हजार १५१ घरे बांधण्याचे काम यापूर्वीच हाती घेतले असून, त्याबाबत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२० मध्येच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनीही जनहित याचिका दाखल केली असून, नवी मुंबई महानगरपालिका त्यामध्ये प्रतिवादी आहे. असे असताना महापालिकेने त्यावर आरक्षण टाकले आहे.

मात्र, ते टाकताना त्यावरील घरांचे बांधकाम थांबविण्याबाबत सिडकोसोबत कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. परंतु, आता आरक्षणाच्या वादामुळे सिडकोचा कोट्यवधी रुपयांचा पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प गोत्यात आला आहे. भविष्यात सिडको विरुद्ध महापालिका सामना रंगण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत ट्रक टर्मिनलची अत्यंत गरजनवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच बाजारपेठांमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणात कृषी माल येतो. शिवाय येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीत साडेतीन हजारांहून अधिक कारखान्यांतही औद्योगिक मालाची ने-आण सुरू असते. यातून शहरांत दररोज सहा ते सात हजार अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, आता एकमेव ट्रक टर्मिनलवर सिडकोने घरांचे बांधकाम सुरू केल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली असून, ते शहरांत वाट्टेल तिथे आपली वाहने उभी करीत आहेत. यातून कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.