शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

स्मार्ट सिटी स्पर्धेतून नवी मुंबई बाद

By admin | Updated: December 9, 2015 00:55 IST

स्मार्ट सिटी स्पर्धेच्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये देशात तिसरा क्रमांक आलेल्या नवी मुंबई मनपाने या स्पर्धेतून स्वत:हून गाशा गुंडाळला आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी स्पर्धेच्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये देशात तिसरा क्रमांक आलेल्या नवी मुंबई मनपाने या स्पर्धेतून स्वत:हून गाशा गुंडाळला आहे. प्रशासनाने विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ८ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला होता; परंतु अंमलबजावणीसाठी एसपीव्ही प्रणालीमुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा येणार असल्याचे सांगून सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसनेच हा ठराव फेटाळला असून, चार महिने प्रशासन व नागरिकांनी घेतलेली मेहनत व खर्चही फुकट गेला आहे. केंद्र शासनाने देशभरातील प्रमुख शहरांचे सर्वेक्षण करून प्राथमिक फेरीत स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी ९८ शहरांची निवड केली होती. यामध्ये नवी मुंबई महापालिकेला देशात तिसरे व राज्यात पहिले मानांकन मिळाले होते. या शहरांमधून अंतिम स्पर्धेसाठी १० ते २० शहरांची निवड केली जाणार होती. अंतिम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व शहरात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांविषयीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठविण्याची अट होती. पालिका प्रशासनाने ८ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी विशेष सर्वसाधारण सभेत मांडला होता. प्रकल्प राबविण्यासाठी निधी उभारणे व प्रत्यक्षात काम करण्यासाठी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) प्रणाली राबविण्यात येणार होती. यामध्ये मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, केंद्र व राज्य शासनाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार होता. निविदा काढण्यापासून सर्व अधिकारी या कमिटीवर राहणार होते. या अटीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी प्रस्तावास तीव्र विरोध केला. शिवसेना व भाजपा प्रतिनिधींनी स्मार्ट सिटीसाठी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावास सहमती दर्शविली. नवी मुंबई देशात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास व्यक्त करून ठरावास सर्वांनी पाठिंबा देण्याची विनंती केली. परंतू राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी एपीव्ही प्रणालीस तीव्र आक्षेप घेऊन बहुमताच्या रोजावर हा प्रस्ताव रद्द केला. यामुळे स्मार्ट सिटी स्पर्धेतून नवी मुंबई बाद होणार आहे.