शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

स्मार्ट सिटी स्पर्धेतून नवी मुंबई बाद

By admin | Updated: December 9, 2015 00:55 IST

स्मार्ट सिटी स्पर्धेच्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये देशात तिसरा क्रमांक आलेल्या नवी मुंबई मनपाने या स्पर्धेतून स्वत:हून गाशा गुंडाळला आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी स्पर्धेच्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये देशात तिसरा क्रमांक आलेल्या नवी मुंबई मनपाने या स्पर्धेतून स्वत:हून गाशा गुंडाळला आहे. प्रशासनाने विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ८ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला होता; परंतु अंमलबजावणीसाठी एसपीव्ही प्रणालीमुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा येणार असल्याचे सांगून सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसनेच हा ठराव फेटाळला असून, चार महिने प्रशासन व नागरिकांनी घेतलेली मेहनत व खर्चही फुकट गेला आहे. केंद्र शासनाने देशभरातील प्रमुख शहरांचे सर्वेक्षण करून प्राथमिक फेरीत स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी ९८ शहरांची निवड केली होती. यामध्ये नवी मुंबई महापालिकेला देशात तिसरे व राज्यात पहिले मानांकन मिळाले होते. या शहरांमधून अंतिम स्पर्धेसाठी १० ते २० शहरांची निवड केली जाणार होती. अंतिम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व शहरात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांविषयीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठविण्याची अट होती. पालिका प्रशासनाने ८ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी विशेष सर्वसाधारण सभेत मांडला होता. प्रकल्प राबविण्यासाठी निधी उभारणे व प्रत्यक्षात काम करण्यासाठी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) प्रणाली राबविण्यात येणार होती. यामध्ये मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, केंद्र व राज्य शासनाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार होता. निविदा काढण्यापासून सर्व अधिकारी या कमिटीवर राहणार होते. या अटीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी प्रस्तावास तीव्र विरोध केला. शिवसेना व भाजपा प्रतिनिधींनी स्मार्ट सिटीसाठी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावास सहमती दर्शविली. नवी मुंबई देशात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास व्यक्त करून ठरावास सर्वांनी पाठिंबा देण्याची विनंती केली. परंतू राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी एपीव्ही प्रणालीस तीव्र आक्षेप घेऊन बहुमताच्या रोजावर हा प्रस्ताव रद्द केला. यामुळे स्मार्ट सिटी स्पर्धेतून नवी मुंबई बाद होणार आहे.