शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवी मुंबई : ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅट कसे चांगले, निवडणूक आयोगाकडून जनजागृती

By नारायण जाधव | Updated: January 10, 2024 16:20 IST

प्रात्यक्षिकाद्वारे जनतेला दिली जातेय माहिती

नवी मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ बरोबर ‘व्हीव्हीपॅट’ मशीन वापरण्यात येणार आहेत. याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडून २७ डिसेंबरपासून २५ जानेवारीपर्यंत जनजागृती मोहीम सुरू आहे. या अंतर्गत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सुरक्षित असून कोणत्याही परिस्थितीत ते रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून हॅक करून वा छेडछाड करून निवडणूक निकाल बदलता येत नाही, हे पटवून दिले जात आहे.

याच अंतर्गत बुधवारी वाशी येथे रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि प्रवाशांना मशीनचे प्रत्यक्ष सादरीकरण करून जनजागृती केली. यावेळी ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीन युनिटही बाजूला ठेवले होते.या जनजागृतीत मतदानयंत्र कसे काम करते, एखाद्या पक्षाला मत दिल्यानंतर मतदार त्याची खात्री कशी करू शकतो, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच निवडणूक अधिकाऱ्यांकडून दाखविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या प्रात्यक्षिकावेळी मतदाराला कोणत्या शंका असतील, तर त्याचे निरसनही करण्यात येत आहे. मतदाराने कोणाला मत दिले, याची खात्री बाजूला ठेवलेल्या व्हीव्हीपॅट मशीनच्या साहाय्याने केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे त्या मतदानाची पावती त्याच यंत्रात संरक्षित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईElectionनिवडणूक