शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: चार गावांनी केले विमानतळाचे काम बंद: मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:43 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेला भराव त्याचबरोबर टेकडी उत्खननाचे काम गुरुवारी चार गावातील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेला भराव त्याचबरोबर टेकडी उत्खननाचे काम गुरुवारी चार गावातील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. ठेकेदारांना गुलाबपुष्प आणि सिडको अधिकाºयांना निवेदन देवून शांततेच्या मार्गाने प्रकल्पबाधितांनी आंदोलन केले.जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कामे सुरू करू न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. विमानतळामुळे बाधित होणाºया दहा गावांतील ग्रामस्थांना सिडकोकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात आली होती. वारंवार झालेल्या बैठकीत बहुतांशी गोष्टी मान्य करण्यात आल्या होत्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतरच विमानतळाचे काम हाती घेण्याचे ठरले होते. संबंधित गावांचे पुनर्वसन न करतात आजूबाजूच्या जागेवर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर उलवे टेकडी फोडण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते. याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पूर्वकल्पना देण्यात आली नाही त्यामुळे तरघर, कोंबडभुजे, ओवळे, गणेशपुरी येथील ग्रामस्थांनी एकत्र येवून हे कामे बंद पाडण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार गुरुवारी उलवे येथील मंदिरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त जमले. पुनर्वसनाबाबत सिडको उदासीन दिसून येत आहे. त्याचबरोबर विमानतळाचे काम मात्र वेगाने केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु जी आश्वासने सिडकोने दिले आहेत त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. जोपर्यंत येथील ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही विवेक पाटील यांनी दिली. राजेंद्र पाटील यांनी ठेकेदार नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही ठेकेदार नेमताना आधी प्रकल्पग्रस्तांचा विचार करा, अशा शब्दात त्यांनी संबंधित नेत्यांना सुनावले.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई