शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नवी मुंबई: चार गावांनी केले विमानतळाचे काम बंद: मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:43 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेला भराव त्याचबरोबर टेकडी उत्खननाचे काम गुरुवारी चार गावातील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेला भराव त्याचबरोबर टेकडी उत्खननाचे काम गुरुवारी चार गावातील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. ठेकेदारांना गुलाबपुष्प आणि सिडको अधिकाºयांना निवेदन देवून शांततेच्या मार्गाने प्रकल्पबाधितांनी आंदोलन केले.जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कामे सुरू करू न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. विमानतळामुळे बाधित होणाºया दहा गावांतील ग्रामस्थांना सिडकोकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात आली होती. वारंवार झालेल्या बैठकीत बहुतांशी गोष्टी मान्य करण्यात आल्या होत्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतरच विमानतळाचे काम हाती घेण्याचे ठरले होते. संबंधित गावांचे पुनर्वसन न करतात आजूबाजूच्या जागेवर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर उलवे टेकडी फोडण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते. याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पूर्वकल्पना देण्यात आली नाही त्यामुळे तरघर, कोंबडभुजे, ओवळे, गणेशपुरी येथील ग्रामस्थांनी एकत्र येवून हे कामे बंद पाडण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार गुरुवारी उलवे येथील मंदिरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त जमले. पुनर्वसनाबाबत सिडको उदासीन दिसून येत आहे. त्याचबरोबर विमानतळाचे काम मात्र वेगाने केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु जी आश्वासने सिडकोने दिले आहेत त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. जोपर्यंत येथील ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही विवेक पाटील यांनी दिली. राजेंद्र पाटील यांनी ठेकेदार नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही ठेकेदार नेमताना आधी प्रकल्पग्रस्तांचा विचार करा, अशा शब्दात त्यांनी संबंधित नेत्यांना सुनावले.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई