शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Navi Mumbai: दबावाला बळी न पडता निर्धाराने लढत रहा, विश्वजीत पाटील यांचे आवाहन

By नामदेव मोरे | Published: February 09, 2024 1:58 PM

Navi Mumbai: जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडू नका, निर्धाराने लढत रहा. नवी मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले आहे. येथील अनागोंधी कारभाराविरोधात असाच आवाज उठवा असे आवाहन काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडू नका, निर्धाराने लढत रहा. नवी मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले आहे. येथील अनागोंधी कारभाराविरोधात असाच आवाज उठवा असे आवाहन काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला संबोधीत करताना विश्वजीत कदम यांनी महानगरपालिकेच्या कामकाजावर हल्लाबोल केला. एकेकाळी विकासासाठी आघाडीवर असणारी महानगरपालिका भ्रष्टाचाराचे करण होत चालली आहे. काही नेतेमंडळीमुळे महानगरपालिकेची ही अवस्था झाली आहे. आरोग्य, पाणी पुरवठ्यासह नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. चुकीच्या कामकाजाविरोधात युवक काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे यांनी आवाज उठविला आहे. शहरवासीयांनी त्यांना साथ द्यावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता पुर्ण ताकदीने लढण्याचे आवाहनही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. देशात, राज्यात व नवी मुंबईमध्येही परिवर्तन करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज जे आयुक्त तुम्हाला वेळ देत नाहीत ते घरी येवून तुम्ही सांगीतलेली जनहिताची कामे करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनिकेत म्हात्रे यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाहीत. आयुक्त पाठपुरावा करूनही वेळ देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. क्रांती हक्क मोर्चाला शहरवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रमाकांत म्हात्रे यांनीही शहरात युवक काँग्रेसच्या माध्यमातून ३६ चौक सभा झाल्या. सर्व सभांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. महानगरपालिकेत तीच तीच कामे पुन्हा पुन्हा केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जनहिताची कामे करत नसतील तर मालमत्ता कर भरू नका असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशीक यांनी काँग्रेसने आतापर्यंत शहराच्या विकासासाठी काय कामे केली याविषयी माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अंकुश सोनावणे, रविंद्र सावंत, मंदाकिनी म्हात्रे, महिला जिल्हा अध्यक्षा पूनम पाटील, अनंत सिंग, उज्वला साळवी, नासीर हुसेन, अन्वर हवालदार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा आढविण्यात आल्यामुळे विश्वजीत कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई