शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:28 IST

शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

नामदेव मोरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ४ हजार शहरांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळविला. राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची देशात ओळख आहे. देश व राज्य पातळीवरील बहुतांश सर्व महत्त्वाचे पुरस्कार महानगरपालिकेने मिळविलेले आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, घनकचरा व्यवस्थापनाची सर्वोत्तम व्यवस्था, अत्याधुनिक पद्धतीने बनविलेली क्षेपणभूमी, शिक्षण व इतर सर्वच विभागांसाठी मनपाने पुरस्कार मिळविले असून, या सर्वांमध्ये स्वच्छता अभियानातील कामगिरी महत्त्वाची आहे.राज्य शासनाने २००२ मध्ये संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान सुरू केले व पहिल्याच वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. २००५ मध्ये पुन्हा या स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळविला. केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर नवी मुंबईने पहिल्या प्रयत्नामध्ये आठव्या क्रमांकावर झेप घेतली. गतवर्षी महानगरपालिकेने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली व घनकचरा व्यवस्थापनात प्रथम क्रमांक मिळविला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील पहिल्या तीन शहरांमध्ये समावेश व्हावा असा निर्धार करून महानगरपालिकेने स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले होते. सर्व शहरवासीयांना या चळवळीमध्ये सहभागी करून घेतल्यामुळेच महानगरपालिकेने देशात सातव्या क्रमांकावरून तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये मिळविलेले यश हे फक्त एक वर्षातील कामाचे फलित नाही. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून प्रत्येक वर्षी स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कोपरखैरणेमधील डम्पिंग ग्राउंड बंद करून तेथे निसर्ग उद्यान बनविले आहे. अशा प्रकारे कचरा डेपोमध्ये बनविलेले हे देशातील सर्वांत भव्य उद्यान आहे. तुर्भेमध्ये अत्याधुनिक पद्धतीने नवीन डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यामध्येही विशेष लक्ष दिले आहे. महानगरपालिकेच्या शाळा, उद्याने सर्वच ठिकाणी कचºयातून खतनिर्मिती करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईकरांचा सहभाग प्रत्येक वर्षी वाढत गेला. लोकसहभाग व नागरिकांमधील स्वच्छतेविषयी जागृती यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेने देशपातळीवर स्वतंत्र ठसा उमटविला आहे.>महानगरपालिकेस मिळालेले पुरस्कारकेंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने देशातील राहण्यायोग्य शहरामध्ये देशात दुसºया क्रमांकाचे मानांकन दिले.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशात सातवा व राज्यातपहिला क्रमांक२०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कारस्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये राज्यात पहिला व देशातआठवा क्रमांक२०११ मध्ये जलवितरण व्यवस्थेसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार२००८ - ०९ मध्ये सर्वोत्तम स्वच्छता सुविधांसाठी संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विशेष पुरस्कार२००९ - सांडपाणी व स्वच्छताविषयी सुविधांसाठी सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार२००९ - शहरी भागातील गरिबांसाठीच्या सुविधांसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कारदेऊन सन्मानितकेंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत दोन वेळा राज्यातील प्रथम क्रमांकसंत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये २००२ व २००५ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक