शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
3
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
4
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
5
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
6
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
7
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
8
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
9
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
10
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
11
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
12
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
13
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
14
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
15
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
16
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
17
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
18
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
19
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
20
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!

नवी मुंबई राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:28 IST

शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

नामदेव मोरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ४ हजार शहरांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळविला. राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची देशात ओळख आहे. देश व राज्य पातळीवरील बहुतांश सर्व महत्त्वाचे पुरस्कार महानगरपालिकेने मिळविलेले आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, घनकचरा व्यवस्थापनाची सर्वोत्तम व्यवस्था, अत्याधुनिक पद्धतीने बनविलेली क्षेपणभूमी, शिक्षण व इतर सर्वच विभागांसाठी मनपाने पुरस्कार मिळविले असून, या सर्वांमध्ये स्वच्छता अभियानातील कामगिरी महत्त्वाची आहे.राज्य शासनाने २००२ मध्ये संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान सुरू केले व पहिल्याच वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. २००५ मध्ये पुन्हा या स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळविला. केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर नवी मुंबईने पहिल्या प्रयत्नामध्ये आठव्या क्रमांकावर झेप घेतली. गतवर्षी महानगरपालिकेने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली व घनकचरा व्यवस्थापनात प्रथम क्रमांक मिळविला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील पहिल्या तीन शहरांमध्ये समावेश व्हावा असा निर्धार करून महानगरपालिकेने स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले होते. सर्व शहरवासीयांना या चळवळीमध्ये सहभागी करून घेतल्यामुळेच महानगरपालिकेने देशात सातव्या क्रमांकावरून तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये मिळविलेले यश हे फक्त एक वर्षातील कामाचे फलित नाही. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून प्रत्येक वर्षी स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कोपरखैरणेमधील डम्पिंग ग्राउंड बंद करून तेथे निसर्ग उद्यान बनविले आहे. अशा प्रकारे कचरा डेपोमध्ये बनविलेले हे देशातील सर्वांत भव्य उद्यान आहे. तुर्भेमध्ये अत्याधुनिक पद्धतीने नवीन डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यामध्येही विशेष लक्ष दिले आहे. महानगरपालिकेच्या शाळा, उद्याने सर्वच ठिकाणी कचºयातून खतनिर्मिती करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईकरांचा सहभाग प्रत्येक वर्षी वाढत गेला. लोकसहभाग व नागरिकांमधील स्वच्छतेविषयी जागृती यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेने देशपातळीवर स्वतंत्र ठसा उमटविला आहे.>महानगरपालिकेस मिळालेले पुरस्कारकेंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने देशातील राहण्यायोग्य शहरामध्ये देशात दुसºया क्रमांकाचे मानांकन दिले.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशात सातवा व राज्यातपहिला क्रमांक२०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कारस्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये राज्यात पहिला व देशातआठवा क्रमांक२०११ मध्ये जलवितरण व्यवस्थेसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार२००८ - ०९ मध्ये सर्वोत्तम स्वच्छता सुविधांसाठी संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विशेष पुरस्कार२००९ - सांडपाणी व स्वच्छताविषयी सुविधांसाठी सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार२००९ - शहरी भागातील गरिबांसाठीच्या सुविधांसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कारदेऊन सन्मानितकेंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत दोन वेळा राज्यातील प्रथम क्रमांकसंत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये २००२ व २००५ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक