शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नवी मुंबई राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:28 IST

शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

नामदेव मोरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ४ हजार शहरांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळविला. राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची देशात ओळख आहे. देश व राज्य पातळीवरील बहुतांश सर्व महत्त्वाचे पुरस्कार महानगरपालिकेने मिळविलेले आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, घनकचरा व्यवस्थापनाची सर्वोत्तम व्यवस्था, अत्याधुनिक पद्धतीने बनविलेली क्षेपणभूमी, शिक्षण व इतर सर्वच विभागांसाठी मनपाने पुरस्कार मिळविले असून, या सर्वांमध्ये स्वच्छता अभियानातील कामगिरी महत्त्वाची आहे.राज्य शासनाने २००२ मध्ये संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान सुरू केले व पहिल्याच वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. २००५ मध्ये पुन्हा या स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळविला. केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर नवी मुंबईने पहिल्या प्रयत्नामध्ये आठव्या क्रमांकावर झेप घेतली. गतवर्षी महानगरपालिकेने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली व घनकचरा व्यवस्थापनात प्रथम क्रमांक मिळविला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील पहिल्या तीन शहरांमध्ये समावेश व्हावा असा निर्धार करून महानगरपालिकेने स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले होते. सर्व शहरवासीयांना या चळवळीमध्ये सहभागी करून घेतल्यामुळेच महानगरपालिकेने देशात सातव्या क्रमांकावरून तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये मिळविलेले यश हे फक्त एक वर्षातील कामाचे फलित नाही. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून प्रत्येक वर्षी स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कोपरखैरणेमधील डम्पिंग ग्राउंड बंद करून तेथे निसर्ग उद्यान बनविले आहे. अशा प्रकारे कचरा डेपोमध्ये बनविलेले हे देशातील सर्वांत भव्य उद्यान आहे. तुर्भेमध्ये अत्याधुनिक पद्धतीने नवीन डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यामध्येही विशेष लक्ष दिले आहे. महानगरपालिकेच्या शाळा, उद्याने सर्वच ठिकाणी कचºयातून खतनिर्मिती करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईकरांचा सहभाग प्रत्येक वर्षी वाढत गेला. लोकसहभाग व नागरिकांमधील स्वच्छतेविषयी जागृती यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेने देशपातळीवर स्वतंत्र ठसा उमटविला आहे.>महानगरपालिकेस मिळालेले पुरस्कारकेंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने देशातील राहण्यायोग्य शहरामध्ये देशात दुसºया क्रमांकाचे मानांकन दिले.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशात सातवा व राज्यातपहिला क्रमांक२०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कारस्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये राज्यात पहिला व देशातआठवा क्रमांक२०११ मध्ये जलवितरण व्यवस्थेसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार२००८ - ०९ मध्ये सर्वोत्तम स्वच्छता सुविधांसाठी संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विशेष पुरस्कार२००९ - सांडपाणी व स्वच्छताविषयी सुविधांसाठी सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार२००९ - शहरी भागातील गरिबांसाठीच्या सुविधांसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कारदेऊन सन्मानितकेंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत दोन वेळा राज्यातील प्रथम क्रमांकसंत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये २००२ व २००५ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक