शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नवी मुंबई बननार सेप्टीक टँक मुक्त शहर; शहरात फक्त ४२ सेप्टीक टँक

By नामदेव मोरे | Updated: July 27, 2023 17:52 IST

सद्यस्थितीमध्ये फक्त ४२ सेप्टीक टँक असून त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येत आहे.

नवी मुंबई : देशातील पहिले सेप्टीक टँक मुक्त शहर व १०० टक्के घरांमध्ये शौचालय असणारे शहर होण्याच्या दृष्टीने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. झोपडपट्टी परिसरातही घरगुती शौचालयांची निर्मीती केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त ४२ सेप्टीक टँक असून त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरभर मलनिस:रण वाहिन्यांचे जाळे तयार केले आहे. ७ अत्याधुनीक मलनिस:रण केंद्राच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्योगांना व उद्यानांसाठी उपयोग केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा व काही झोपडपट्टी परिसरामध्ये एकूण ४२ सेप्टीक टँक आहेत. त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत यादवनगरमध्ये २ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. दिघा परिसरात २९ कोटी रूपये खर्च करून मलनिस:रण वाहिन्या व मलउदंचन केद्र बांधण्याचे काम केले जाणार आहे.२०१५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ५७४४ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आले होते. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने ४०६ सार्वजनीक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ४३४० सीट्स उपलब्ध आहेत. झोपडपट्टी परिसरामध्येही घरगती शौचालय उभारण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या अनुदानातून १६८२ घरांमध्ये घरगुती शौचालय बांधण्यात आले आहेत. शेल्टर असोसिएट्स पुणे यांच्या माध्यमातून ४०२४ वैयक्तीक व घरगुती शौचालय बांधणले आहेत. १०० टक्के घरांमध्ये शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर सेप्टीकमुक्त करण्यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका