शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव; प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 05:56 IST

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  

लोकमत न्यूज नेटवर्क 

पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्य ठरावाला स्थगिती दिली होती, मात्र शनिवारी पुन्हा  शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात ‘दिबां’च्या नावाचा ठराव मंजूर केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.  या निर्णयाची माहिती मिळताच लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २९ तारखेला हा ठराव मंजूर केला होता. तो वैध नसल्याचे सांगून त्याला शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. त्यांच्या या निर्णयाविरोधात टीकेची झोड उठविण्यात आली. मात्र, या निर्णयाबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता.

इतर पदाधिकारी उपस्थित

शनिवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तो ठराव पुन्हा मंजूर करून प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांसह सर्व समाजातील व्यक्तींचा सन्मान केला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नव्याने ठराव मंजूर केल्याने आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो. ‘दिबां’च्या नावासाठी पुढे केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहोत. -दशरथ पाटील, अध्यक्ष, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती 

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागले पाहिजे, यासाठी सर्व समाजातील लोक, प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्र एकसंध झाले. त्या अनुषंगाने भव्य आंदोलने झाली. या लढ्याला यश आले आहे. आम्हाला आनंद आहे की, राज्य सरकारने ‘दिबां’च्या नावाचा निर्णय घेतला,  त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.  - रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती 

‘दिबां’च्या नामकरण आंदोलनामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे. शनिवारी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खरोखरच आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकालाच त्याचा आनंद वाटत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असल्याने केंद्रामार्फतदेखील ‘दिबां’च्या नावाचा नक्कीच विचार केला जाईल, अशी आशा आहे. - सर्वेश तरे, आगरी कोळी साहित्यिक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदे