शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
3
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
4
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
5
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
6
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
7
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
8
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
9
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
10
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
11
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
12
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
14
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
15
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
16
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
17
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
18
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
19
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
20
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव; प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 05:56 IST

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  

लोकमत न्यूज नेटवर्क 

पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्य ठरावाला स्थगिती दिली होती, मात्र शनिवारी पुन्हा  शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात ‘दिबां’च्या नावाचा ठराव मंजूर केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.  या निर्णयाची माहिती मिळताच लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २९ तारखेला हा ठराव मंजूर केला होता. तो वैध नसल्याचे सांगून त्याला शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. त्यांच्या या निर्णयाविरोधात टीकेची झोड उठविण्यात आली. मात्र, या निर्णयाबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता.

इतर पदाधिकारी उपस्थित

शनिवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तो ठराव पुन्हा मंजूर करून प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांसह सर्व समाजातील व्यक्तींचा सन्मान केला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नव्याने ठराव मंजूर केल्याने आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो. ‘दिबां’च्या नावासाठी पुढे केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहोत. -दशरथ पाटील, अध्यक्ष, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती 

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागले पाहिजे, यासाठी सर्व समाजातील लोक, प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्र एकसंध झाले. त्या अनुषंगाने भव्य आंदोलने झाली. या लढ्याला यश आले आहे. आम्हाला आनंद आहे की, राज्य सरकारने ‘दिबां’च्या नावाचा निर्णय घेतला,  त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.  - रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती 

‘दिबां’च्या नामकरण आंदोलनामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे. शनिवारी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खरोखरच आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकालाच त्याचा आनंद वाटत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असल्याने केंद्रामार्फतदेखील ‘दिबां’च्या नावाचा नक्कीच विचार केला जाईल, अशी आशा आहे. - सर्वेश तरे, आगरी कोळी साहित्यिक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदे