शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:40 IST

सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम यंदाच्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सिडको आणि अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन या विमानतळाचे भव्य उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.  त्यामुळे गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवून  कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यामुळे १७ सप्टेंबरचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवशी विमातळाचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त हुकणार आहे.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलचे प्रशांत ठाकूर, उरणचे महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर  यांच्या समवेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, तसेच अदानी समूहाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.  अदानी समूहातर्फे जीत अदानी हे देखील पाहणीवेळी उपस्थित होते. कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी संवाद साधला.

सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. मात्र, व्यावसायिक परवानग्या मिळवण्यासाठी भौतिक कामांची पूर्णता आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही अडथळे न ठेवता काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

नामकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा विमानतळाचे सध्या ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास आहे. दरम्यान, विमानतळास दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास आहे. तरीही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

शहरातच चेक इन व्यवस्थादेशातील पहिले  ग्रीनफिल्ड विमानतळ दोन स्वतंत्र रनवेसह उभारले जात आहे. या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता आहे.  ही क्षमता मुंबईच्या  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ३७ मेगावॅट विजेच्या वापरासह संपूर्ण परिसरात इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर भर दिला जाणार आहे.  टर्मिनल ते टर्मिनल जाण्यासाठी भूमिगत मेट्रो, प्रवाशांसाठी ट्रॅव्हलर यंत्रणा आणि शहरातूनच ‘इन-सिटी चेक-इन’ यासारख्या आधुनिक सुविधांची आखणी केली जात आहे. त्याशिवाय विमानतळाला जोडण्यासाठी बहुआयामी वाहतूक योजना तयार केली जात असल्याचेही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ