शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:40 IST

सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम यंदाच्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सिडको आणि अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन या विमानतळाचे भव्य उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.  त्यामुळे गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवून  कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यामुळे १७ सप्टेंबरचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवशी विमातळाचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त हुकणार आहे.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलचे प्रशांत ठाकूर, उरणचे महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर  यांच्या समवेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, तसेच अदानी समूहाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.  अदानी समूहातर्फे जीत अदानी हे देखील पाहणीवेळी उपस्थित होते. कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी संवाद साधला.

सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. मात्र, व्यावसायिक परवानग्या मिळवण्यासाठी भौतिक कामांची पूर्णता आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही अडथळे न ठेवता काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

नामकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा विमानतळाचे सध्या ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास आहे. दरम्यान, विमानतळास दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास आहे. तरीही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

शहरातच चेक इन व्यवस्थादेशातील पहिले  ग्रीनफिल्ड विमानतळ दोन स्वतंत्र रनवेसह उभारले जात आहे. या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता आहे.  ही क्षमता मुंबईच्या  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ३७ मेगावॅट विजेच्या वापरासह संपूर्ण परिसरात इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर भर दिला जाणार आहे.  टर्मिनल ते टर्मिनल जाण्यासाठी भूमिगत मेट्रो, प्रवाशांसाठी ट्रॅव्हलर यंत्रणा आणि शहरातूनच ‘इन-सिटी चेक-इन’ यासारख्या आधुनिक सुविधांची आखणी केली जात आहे. त्याशिवाय विमानतळाला जोडण्यासाठी बहुआयामी वाहतूक योजना तयार केली जात असल्याचेही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ