शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नवी मुंबई विमानतळ: १० किमी परिघात प्राणी कत्तल, कचरा आणि घातक पदार्थ टाकण्यास मनाई

By नारायण जाधव | Updated: January 7, 2025 07:14 IST

एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन, सुरळीत संचालन होणार

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कोणत्याही परिस्थितीत एप्रिलपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडको आणि विकासक अदानी एअरपोर्ट कंपनीने केलेला असतानाच, आता राज्याच्या नगरविकास विभागानेही ‘एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती’ची स्थापना करून एक पाऊल पुढे टाकले आहे.

यानुसार विमानतळाच्या बिंदूपासून १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करणे, त्यांची कातडी वा अवशेष टाकणे, कचरा व इतर घातक पदार्थ टाकण्यास मनाई करण्यात येणार आहे. ‘एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात येणार आहेत.

२० अधिकाऱ्यांचा समावेश

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक या समितीचे अध्यक्ष राहणार असून, विभागीय कोकण आयुक्त, नवी मुंबई पालिका आणि  पनवेल पालिका आयुक्त, नवी मुंबई पोलिस आयुक्त, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त, रायगडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, नागरी विमान वाहतुकीचे महासंचालक, प्रदूषण  नियंत्रण मंडळाचे संचालक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एअरलाइन कंपन्यांचे प्रतिनिधी, कोकण पाटबंधारे महामंडळाच्या संचालकांसह २० अधिकाऱ्यांचा एरोड्रोम समितीत समावेश आहे. विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असल्याचे नगरविकास विभागाने ६ जानेवारीच्या निर्णयात म्हटले आहे.

ही आहे समितीची कार्यकक्षा

  • विविध प्रकारचे पक्षी प्राण्यांचे टाकलेले अवशेष खातात. यामुळे विमानतळ परिसरात असे अवशेष टाकल्यास पक्ष्यांची संख्या वाढून त्यांचा ये-जा करणाऱ्या विमानांना धोका निर्माण होऊन अपघात होण्याची भीती आहे.
  • यामुळे  विमानतळाच्या १० किमीच्या त्रिज्येच्या परिसरात प्राण्यांची कत्तल करून त्यांचे अवशेष फेकण्यास मनाई केली आहे. याबाबतचा निर्णय समितीने घ्यायचा आहे.
  • नागरी विमान वाहतूक आवश्यकता मार्गदर्शिका सीएआर ४, ब.१ अनुच्छेद ०.४.४ आणि २०१० च्या एरोड्रोम ॲडव्हायझरी सेक्युलर - एडी एसी ६ चे पालन करणे आवश्यक आहे. त्याच्या तरतुदी विचारात घेऊन निर्णय घेणे. 
  • हवाई अड्ड्याच्या आसपास १० ते १० किमीच्या क्षेत्रात पर्यावरणीय स्वच्छता ठेवण्यासाठी उपाययोजना समितीने सुचवायच्या आहेत.
  • समितीने प्रत्येक महिन्याला बैठक घेणे आवश्यक राहील. समिती सदस्यांव्यतिरिक्त इतर अन्य सदस्यांना बैठकीस आमंत्रित करता येईल.

‘या’ विमानतळांची कामे मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. राज्यातील ११ विमानतळांचा आढावा घेण्यात आला. विमान वाहतूक हे सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. देश ५ ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे.  सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाइट लँडिंग होईल, असे नियोजन करा, तसेच शिर्डी नाइट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा, नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवा, असे फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा, पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

वाढवणला नवीन विमानतळ?

  • वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या १० बंदरांपैकी एक हे बंदर असणार आहे. देशातील सर्वांत मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे. 
  • या भागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार आहे. या ठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे, यासाठी वाढवण येथे नवीन विमानतळाचा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ