शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नवी मुंबईतून राष्ट्रवादीला मताधिक्याची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:29 PM

ठाणे लोकसभा मतदारसंघ : गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला

नवी मुंबई : ठाणे लोकसभा क्षेत्रात सहापैकी विधानसभेचे ऐरोली आणि बेलापूर हे दोन मतदारसंघ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोडतात. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबोला असला, तरी मोदी लाटेत बेलापूरचा किल्ला राष्ट्रवादीला गमवावा लागला होता, तर ऐरोली विधानसभा क्षेत्रात अगदी निसटता विजय मिळविण्यास राष्ट्रवादीला यश आले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातून या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अनंत परांजपे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना निवडून आणण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी उचलला होता. लोकसभेच्या मागील निवडणुकीत नवी मुंबईतून शिवसेनेचे राजन विचारे यांना आघाडी मिळाली होती. मात्र, या वेळी ही आघाडी मोडीत काढून परांजपे यांना मताधिक्य मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून तब्बल ३५ हजार, तर ऐरोली मतदारसंघातून जवळपास २० हजार मताधिक्य मिळाले होते. एकूणच त्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून सुमारे ५५ हजार मतांची लीड घेतली होती. या वेळी विचारे यांना नवी मुंबईतून मागच्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिवसेनाला वाटत आहे. तर नवी मुंबईतून परांजपे यांना किमान ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, अशी खात्री राष्ट्रवादीला वाटते आहे.

मागील पाच वर्षांत दिघ्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला. राष्ट्रवादीचे नवीन गवते यांच्या कुटुंबात तीन नगरसेवक आहेत, त्यामुळे या परिसरात गवते कुटुंबीयांचा प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत या विभागातील मते कोणाच्या पारड्यात पडली, हे उद्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेले संदीप नाईक यांच्या विरोधात लढलेले त्यांचे चुलत बंधू वैभव नाईक यांना ४६ हजार मते मिळाली होती, या वेळी नाईक कुटुंबीयांतील राजकीय दरी दूर झाल्याचे दिसून आले. त्याचा राष्ट्रवादीचे अनंत परांजपे यांना किती फायदा होतो, हे स्पष्ट होणार आहे.माजी मंत्री गणेश नाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे परांजपे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचाराचा धुराळा उडविला. त्यांच्या सोबतीला माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी काँग्रेसशी जुळवून घेण्यातही नाईक यांना यश आल्याचे दिसून आले. त्यामुळे याचा किती प्रभाव मतदारांवर पडतो, हेही गुरुवारी स्पष्ट होणार आहे.युतीमध्ये मनोमिलनाचा अभावबेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत सेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्यापेक्षा अवघ्या दीड हजार मताधिक्यांनी विजयी झालेल्या मंदा म्हात्रे यांना ५५,३१६ इतकी मते मिळाली होती.नाहटा आणि मंदा म्हात्रे यांना मागच्या निवडणुकीत मिळालेली एकगठ्ठा मते विचारे यांच्या पारड्यात पडतील, अशी अटकळ शिवसेनेचे नेते बांधत आहेत; परंतु प्रत्यक्ष प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यात फारसे मनोमिलन झाल्याचे दिसले नाही, त्यामुळे बेलापूरमधून राजन विचारे मतांची आघाडी राखण्यात कितपत यशस्वी होतील, हे मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :maval-pcमावळ