शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

पोलिसांच्या प्रयत्नामुळे ‘नांदा सौख्य भरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:17 IST

किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमधील वादाची प्रकरणे वाढत आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमधील वादाची प्रकरणे वाढत आहेत. या वादातून घटस्फोटाचे पाऊल उचलले जात आहे; परंतु अशा टोकाच्या निर्णयापर्यंत गेलेल्या २८४ संसाराचा घटस्फोट पोलिसांच्या प्रयत्नामुळे टळला आहे. महिला साहाय्य कक्षाने पती-पत्नीमधील वादाचे कारण शोधून सामंजस्याने त्यावर तोडगा काढून त्यांच्या संसाराचा गाढा रुळावर आणला आहे.विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे हल्ली लग्नानंतर बहुतांश दाम्पत्ये स्वतंत्र राहताना दिसत आहेत. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसात त्यापैकी अनेकांमध्ये किरकोळ वादाला सुरुवात झाल्यानंतर त्यातून टोकाची भूमिका घेत घटस्फोट घेऊन वेगळे होण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा दाम्पत्यांची समजूत काढून त्यांचे संसार टिकवण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांकडून होत आहे. त्याकरिता गुन्हे शाखेचे महिला साहाय्य कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. गतवर्षात पती-पत्नीमधील वादाच्या ९२१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.आपसातील किरकोळ वाद, गैरसमज तसेच भविष्यातील नियोजन आदी त्यांच्यातील वादाची कारणे आहेत; परंतु त्यांची समजूत काढण्यात दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना फारसे यश येत नाही. त्यामुळे वेगळे होण्यातच दोघांचेही हित असल्याच्या निर्णयावर ते पोहोचत असल्याने, त्यांच्याकडून घटस्फोटासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे पती-पत्नीमधील वादाची तक्रार प्राप्त होताच त्यांच्यातील वादाचे नेमके कारण समजून कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यावर तोडगा काढण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून महिला साहाय्य कक्षाकडून होत आहे. त्यानुसार गतवर्षात प्राप्त झालेल्या ९२१ तक्रारींपैकी ८२९ प्रकरणे पोलिसांनी निकाली काढली असून त्यापैकी २८४ प्रकरणात संभाव्य काडीमोड पोलिसांच्या प्रयत्नामुळे टळला आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे व त्यांच्या पथकाने तक्रारदारांचे प्रबोधन करून हे यश मिळवले आहे. तर ५४७ प्रकरणात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.मागील पाच वर्षांत पती-पत्नी यांच्यातील वादातून पोलिसांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यानुसार मागील नऊ वर्षांत ४,३६८ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १,३२१ दाम्पत्यांचा संभाव्य काडीमोड टाळण्यात गुन्हे शाखा पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाला यश आले आहे. त्याकरिता पती-पत्नी यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचेही समुपदेशन पोलिसांना करावे लागले. पोलिसांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून झालेला दुरावा संपुष्टात येऊन संसाराचा गाढा रुळावर आला आहे.>आपसातील किरकोळ वादातून अनेक दाम्पत्य घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयाकडे पोहोचतात; परंतु तत्पूर्वी त्यांच्यातील गैरसमज दूर करून पुन्हा संसार थाटता यावेत, याची एक संधी महिला साहाय्य कक्षामार्फत देण्याचा प्रयत्न असतो. त्यानुसार गतवर्षात पती-पत्नीकडून एकमेकांविरोधातल्या ९२१ तक्रारींपैकी २८४ दाम्पत्यांमधील गैरसमज दूर करण्यात आले आहेत. यामुळे त्यांचे घटस्फोट टळले असून त्यांच्या संसाराचा गाढा रुळावर आला आहे.- प्रवीणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखागैरसमज, आपसातील किरकोळ वाद, तसेच भविष्यातील नियोजन आदी कारणामुळे वाद वाढत आहेत. गतवर्षात ९२१ तक्रारींपैकी ८२९ प्रकरणे पोलिसांनी निकाली काढली असून २८४ प्रकरणात समझोता करण्यात आला आहे.>वर्ष प्राप्त तक्रारी निर्गती समझोता निकाल२०१५ ४९२ ४९२ १७२ ३१८२०१६ ४८४ ४८४ १३९ ३४५२०१७ ६०४ ६०४ १४२ ४२९२०१८ ७७५ ७७५ २२४ ५५१२०१९ ९२१ ८२९ २८४ ५४७