शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या प्रयत्नामुळे ‘नांदा सौख्य भरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:17 IST

किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमधील वादाची प्रकरणे वाढत आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमधील वादाची प्रकरणे वाढत आहेत. या वादातून घटस्फोटाचे पाऊल उचलले जात आहे; परंतु अशा टोकाच्या निर्णयापर्यंत गेलेल्या २८४ संसाराचा घटस्फोट पोलिसांच्या प्रयत्नामुळे टळला आहे. महिला साहाय्य कक्षाने पती-पत्नीमधील वादाचे कारण शोधून सामंजस्याने त्यावर तोडगा काढून त्यांच्या संसाराचा गाढा रुळावर आणला आहे.विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे हल्ली लग्नानंतर बहुतांश दाम्पत्ये स्वतंत्र राहताना दिसत आहेत. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसात त्यापैकी अनेकांमध्ये किरकोळ वादाला सुरुवात झाल्यानंतर त्यातून टोकाची भूमिका घेत घटस्फोट घेऊन वेगळे होण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा दाम्पत्यांची समजूत काढून त्यांचे संसार टिकवण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांकडून होत आहे. त्याकरिता गुन्हे शाखेचे महिला साहाय्य कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. गतवर्षात पती-पत्नीमधील वादाच्या ९२१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.आपसातील किरकोळ वाद, गैरसमज तसेच भविष्यातील नियोजन आदी त्यांच्यातील वादाची कारणे आहेत; परंतु त्यांची समजूत काढण्यात दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना फारसे यश येत नाही. त्यामुळे वेगळे होण्यातच दोघांचेही हित असल्याच्या निर्णयावर ते पोहोचत असल्याने, त्यांच्याकडून घटस्फोटासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे पती-पत्नीमधील वादाची तक्रार प्राप्त होताच त्यांच्यातील वादाचे नेमके कारण समजून कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यावर तोडगा काढण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून महिला साहाय्य कक्षाकडून होत आहे. त्यानुसार गतवर्षात प्राप्त झालेल्या ९२१ तक्रारींपैकी ८२९ प्रकरणे पोलिसांनी निकाली काढली असून त्यापैकी २८४ प्रकरणात संभाव्य काडीमोड पोलिसांच्या प्रयत्नामुळे टळला आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे व त्यांच्या पथकाने तक्रारदारांचे प्रबोधन करून हे यश मिळवले आहे. तर ५४७ प्रकरणात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.मागील पाच वर्षांत पती-पत्नी यांच्यातील वादातून पोलिसांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यानुसार मागील नऊ वर्षांत ४,३६८ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १,३२१ दाम्पत्यांचा संभाव्य काडीमोड टाळण्यात गुन्हे शाखा पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाला यश आले आहे. त्याकरिता पती-पत्नी यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचेही समुपदेशन पोलिसांना करावे लागले. पोलिसांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून झालेला दुरावा संपुष्टात येऊन संसाराचा गाढा रुळावर आला आहे.>आपसातील किरकोळ वादातून अनेक दाम्पत्य घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयाकडे पोहोचतात; परंतु तत्पूर्वी त्यांच्यातील गैरसमज दूर करून पुन्हा संसार थाटता यावेत, याची एक संधी महिला साहाय्य कक्षामार्फत देण्याचा प्रयत्न असतो. त्यानुसार गतवर्षात पती-पत्नीकडून एकमेकांविरोधातल्या ९२१ तक्रारींपैकी २८४ दाम्पत्यांमधील गैरसमज दूर करण्यात आले आहेत. यामुळे त्यांचे घटस्फोट टळले असून त्यांच्या संसाराचा गाढा रुळावर आला आहे.- प्रवीणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखागैरसमज, आपसातील किरकोळ वाद, तसेच भविष्यातील नियोजन आदी कारणामुळे वाद वाढत आहेत. गतवर्षात ९२१ तक्रारींपैकी ८२९ प्रकरणे पोलिसांनी निकाली काढली असून २८४ प्रकरणात समझोता करण्यात आला आहे.>वर्ष प्राप्त तक्रारी निर्गती समझोता निकाल२०१५ ४९२ ४९२ १७२ ३१८२०१६ ४८४ ४८४ १३९ ३४५२०१७ ६०४ ६०४ १४२ ४२९२०१८ ७७५ ७७५ २२४ ५५१२०१९ ९२१ ८२९ २८४ ५४७