शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

 विमानतळाच्या नामकरणाला राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: October 8, 2023 19:17 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. उत्स्फुर्त झालेल्या या लढ्याची दखल घेत राज्य आणि केंद्र शासनाने यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. हे एका व्यक्तिचे किंवा पक्षाचे यश नसून दिबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देवू नये, असे आवाहन केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कृती समितीची बैठक वाशी येथे पार पडली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. एव्हिएशन विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे गेला आहे. पुढील तीन चार दिवसांत या प्रकरणी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच हा प्रत्येकाच्या अस्मितेचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात कोणीही गटबाजी करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कृती समितीची लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठकनवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याची सूचना गणेश नाईक यांनी या बैठकीत केली आहे. त्यानुसार संघर्ष समितीतील २० ते २५ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच ही बैठक घेतली जाणार असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील