शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

 विमानतळाच्या नामकरणाला राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: October 8, 2023 19:17 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. उत्स्फुर्त झालेल्या या लढ्याची दखल घेत राज्य आणि केंद्र शासनाने यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. हे एका व्यक्तिचे किंवा पक्षाचे यश नसून दिबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देवू नये, असे आवाहन केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कृती समितीची बैठक वाशी येथे पार पडली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. एव्हिएशन विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे गेला आहे. पुढील तीन चार दिवसांत या प्रकरणी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच हा प्रत्येकाच्या अस्मितेचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात कोणीही गटबाजी करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कृती समितीची लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठकनवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याची सूचना गणेश नाईक यांनी या बैठकीत केली आहे. त्यानुसार संघर्ष समितीतील २० ते २५ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच ही बैठक घेतली जाणार असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील