शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

 विमानतळाच्या नामकरणाला राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: October 8, 2023 19:17 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. उत्स्फुर्त झालेल्या या लढ्याची दखल घेत राज्य आणि केंद्र शासनाने यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. हे एका व्यक्तिचे किंवा पक्षाचे यश नसून दिबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देवू नये, असे आवाहन केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कृती समितीची बैठक वाशी येथे पार पडली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. एव्हिएशन विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे गेला आहे. पुढील तीन चार दिवसांत या प्रकरणी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच हा प्रत्येकाच्या अस्मितेचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात कोणीही गटबाजी करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कृती समितीची लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठकनवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याची सूचना गणेश नाईक यांनी या बैठकीत केली आहे. त्यानुसार संघर्ष समितीतील २० ते २५ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच ही बैठक घेतली जाणार असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील