शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मृत्यू दाखल्यावरून वारसाचे नाव गायब, नवी मुंबई महापालिकेचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 00:24 IST

कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत.

नवी मुंबई : मृतदेहांची अदलाबदल, जीवंत माणसाला मृत्यू घोषित करणे अशा प्रकारानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने आता मृत्यू दाखल्यावरून वारसदारांची नावेच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात विचारणा करायला गेलेल्या नातेवाइकांना संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरेसुद्धा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. केवळ आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित विभागाचे कामकाज सुरू आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत.तुर्भे सेक्टर २१ येथील प्रदीप गायकवाड या तरुणाचा २0 मे २0२0 रोजी मलेरियामुळे महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची कोविड चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीच्या काही दिवसांनंतर प्रदीपच्या नातेवाइकांनी मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात अर्ज केला.परंतु रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या कागदपत्रांवर मृतांच्या वारसांचा नामोल्लेख नसल्याने मृत्यू दाखल्यावर वारसदारांची नावे टाकता येणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. तसेच रुग्णालयाने लिहून दिल्यास वारसदारांच्या नावांचा समावेश करता येईल, असेही विभाग कार्यालयाकडून स्पष्ट करण्यातआले.त्यानुसार मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयातून वारसदारांची नावे समाविष्ट करण्याबाबतचे लिखित पत्रही आणले. परंतु त्यानंतरसुद्धा मृत्यू दाखल्यात वारसांची नावे समाविष्ट करणे नियमाने शक्य नसल्याचे नातेवाइकांना सांगण्यातआले.प्रदीप गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, चार महिन्यांची मुलगी आणि आई असा परिवार आहे. प्रदीप हा एकटा कमविणारा होता. त्याच्या मृत्यूनंतर तो नोकरी करीत असलेल्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या पत्नीला संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी वारसदारांच्या नावासह पतीच्या मृत्यू दाखल्याची गरज आहे. पतीच्या निधनानंतर त्याची पत्नीच खरी वारसदार असते. असे असतानाही मृत्यू दाखल्यात मयत प्रदीप गायकवाड याच्या वारसांच्या नावांचा समावेश करण्याबाबत संबंधित विभाग चालढकल करीत असल्याचा आरोप प्रदीपचे काका भास्कर गायकवाड यांनी केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका