शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

झोपडपट्टी परिसरात नालेसफाईचा बोजवारा

By admin | Updated: May 8, 2017 06:36 IST

महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. शहराच्या विविध भागांत नाल्यातील गाळ उपसण्याची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. शहराच्या विविध भागांत नाल्यातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे असले तरी झोपडपट्टी परिसरात मात्र अद्यापि, या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर्षीसुद्धा झोपडपट्टी परिसरात या कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही खबरदारी बाळगली जात नाही. त्यामुळे ही मान्सूनपूर्व साफसफाईची कामे म्हणजे केवळ औपचारिकता ठरल्याचे दिसून आले आहे. शहरी भागात ठिकठिकाणी नाल्यातील गाळ उपसून तो पदपथांवर गोळा करण्यात आला आहे. काही भागांतील कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी अद्यापि गाळ उपसण्याची कामे सुरू आहेत; परंतु झोपडपट्टी परिसरात अद्यापि कामाला सुरुवातच करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या परिसरात अगोदरच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. नाले,गटारात प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, बीअरच्या बाटल्या आदी घनकचरा साचला आहे. या परिसरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणा अपुऱ्या आहेत. मलनि:सारण वाहिन्या केवळ नावालाच आहेत. बहुतांशी ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्यात मलवाहिन्या सोडल्या आहेत. एकूणच या वसाहतीतील रहिवाशांनी १२ महिने दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर बनते. त्यामुळे पावसाळ्याअगोदर नालेसफाईची कामे होणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे मत आहे; परंतु प्रत्येक वर्षी झोपडपट्टी परिसरातील नालेसफाईच्या कामांना प्रशासनाकडून दुय्यम दर्जा दिला जात असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ व ५मध्ये सध्या दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. गणपतीपाडा येथील रेल्वे मार्गालगत असणारे नाले पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. तसेच इलठाणपाडा, सुभाषनगर, कन्हैयानगर आदी भागांतील नाल्यांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, नालेसफाईला लवकरच सुरुवात केली जाईल, असे दिघा विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. झोपडपट्टी परिसरात अद्यापि, नालेसफाईची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. शेवटच्या क्षणी घाईघाईत ही कामे उरकण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेष म्हणजे, दैनंदिन साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांवरच नालेसफाईची जबाबदारी टाकली जाते. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसणार आहे.- जगदीश गवते, नगरसेवक (प्रभाग क्रमांक ५)