शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘नाला व्हिजन’साठी ७०० कोटींचा निधी अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:06 IST

शहरातील मोठ्या नाल्यांचा जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित विकास करण्याची योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने पालिकेचा हा प्रकल्प नाकारला आहे.

नामदेव मोरे ।नवी मुंबई : शहरातील मोठ्या नाल्यांचा जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित विकास करण्याची योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने पालिकेचा हा प्रकल्प नाकारला आहे. ७४ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचा विकास करण्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. निधीअभावी एकत्रित विकास न करता प्राधान्यक्रम ठरवून नाल्यांची डागडुजी करावी लागणार आहे.दिघा ते बेलापूरपर्यंत पसरलेल्या डोंगररांगांवरून येणारे पावसाचे पाणी दहा प्रमुख व २९ उपनाल्यांमधून खाडीकडे जाते. शहरात ७४ किलोमीटर लांबीचे नैसर्गिक नाले आहेत. दिघा, चिंचपाडा, विष्णूनगर, इंदिरानगर, नेरूळ,राबाडा व इतर अनेक ठिकाणी नाल्याच्या कडेला लोकवस्ती झाली आहे. २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये नाल्यांमधील पाणी वस्तीमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. १२ वर्षांपासून सर्वपक्षीय नगरसेवक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. नागरिक व सामाजिक कार्यकर्तेही याविषयी वारंवार पाठपुरावा करत आहेत. परंतु महापालिका प्रशासनातर्फे जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित नाला व्हिजन राबविण्यात येणार आहे. याविषयी केंद्र शासनाला प्रस्ताव दिला असून त्याला मंजुरी दिल्यानंतर संरक्षण भिंत व सुशोभीकरणाची कामे केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. केंद्र शासनाला याविषयी आराखडाही सादर करण्यात आला होता. स्थायी समिती, प्रभाग समिती व सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी नगरसेवकांनी आवाज उठविला की जेएनएनयूआरएमचे नाव सांगून सर्वांना गप्प करण्यात येत होते. परंतु जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये बहादूर बिष्ट यांनी चिंचपाडा येथील नाल्याला संरक्षण भिंत बांधली नाही तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तत्काळ याविषयी कार्यवाही करण्याची मागणी केली होती. शहर अभियंता मोहन डगावकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, जेएनएनयूआरएमअंतर्गत दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. यामुळे भविष्यात गरज पाहून व अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे कामे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.औद्योगिक वसाहतीमधील येणाºया नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी उद्योजकांनी त्यांच्या सुविधेसाठी नाल्यांचा प्रवाह बदलला आहे. नाल्यांमध्ये डेब्रिज टाकून त्यांचा आकार कमी करण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे. नाल्याला लागून झोपड्यांचे बांधकाम झाले आहे. या सर्र्वांमुळे मोठ्या नाल्यांचा आकार कमी होत आहे. शहरामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्यास चिंचपाडासह इतर अनेक ठिकाणी लोकवस्तीमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून प्रशासनाने आवश्यकतेप्रमाणे नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.