शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

  पाणी पुरवठ्याचे संतुलन राखण्यासाठी मनपाने कसली कंबर; दिवसातून सात तास होणार पाणीपुरवठा 

By नामदेव मोरे | Updated: October 20, 2023 19:32 IST

जलकुंभ भरण्यासाठीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे.

नवी मुंबई : शहरातील सर्व विभागांमध्ये समान प्रमाणात पाणी मिळावे यासाठी महानगरपालिकेने वितरण प्रणालीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ भरण्यासाठीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. प्रत्येक विभागाला दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा केला जाणार असून अतीरिक्त जलस्त्रोतांचा शोधही सुरू केला आहे. नवी मुंबईमध्ये अनेक विभागामध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. पाण्यासाठी आंदोलनही सुरू झाले आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व धरणात पुरेसा पाणी साठा असतानाही पाणी टंचाई होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 या तक्रारींची गांभीर्याने दखल महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतली आहे. विशेष बैठकीचे आयोजन करून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत असलेल्या घणसोली, ऐरोली व इतर परिसरात पुरेसे पाणी मिळत नाही. या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना करण्यात आल्या. शहर अभियंता संजय देसाई यांनी शहराची भौगोलीक परिस्थिती लक्षात घेवून पाणीपुरवठ्याचा विभागनिहाय अभ्यास करून जलकुंभ भरण्याच्या वेळांमध्यं बदल करण्याचा आराखडा बैठकीत सादर केला. 

बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे भागात पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार आहे. घणसोली विभागात सायंकाळी साडेआठ ते रात्री दोन, ऐरोली,दिघा विभागात दुपारी दोन ते पहाटे चार या वेळेत जलकुंभ भरले जाणार आहेत. शहरवासीयांना पुर्वीप्रमाणे सकाळी व सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा सुरू राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. यापुढे सर्व विभागांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

मोरबेतून ४५० दशलक्ष लीटर पाणीमहानगरपालिकेच्या मोरबे धरणात १८४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा शिल्लक आहे. येथून प्रतीदिन ४५० दशलक्ष लीटर पाणी शहराला पुरविले जात आहे. एमआयडीसीकडून ८० दशलक्ष लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तेथून ६० ते ६५ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून दिघा, ऐरोली, घणसोली, एमआयडीसीतील नेरूळ, शिवाजीनगर, बोनसरी,इंदिरानगर, गणपतीपाडा, महापेगाव, पावणेगाव, रबाळे, कातकरीपाडा, भीमनगर, आंबेडकरनगर, वाल्मिकीनगर, चिंचपाडा, यादवनगर, गवतेवाडी व संपूर्ण दिघा परिसराला पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी