शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

  पाणी पुरवठ्याचे संतुलन राखण्यासाठी मनपाने कसली कंबर; दिवसातून सात तास होणार पाणीपुरवठा 

By नामदेव मोरे | Updated: October 20, 2023 19:32 IST

जलकुंभ भरण्यासाठीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे.

नवी मुंबई : शहरातील सर्व विभागांमध्ये समान प्रमाणात पाणी मिळावे यासाठी महानगरपालिकेने वितरण प्रणालीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ भरण्यासाठीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. प्रत्येक विभागाला दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा केला जाणार असून अतीरिक्त जलस्त्रोतांचा शोधही सुरू केला आहे. नवी मुंबईमध्ये अनेक विभागामध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. पाण्यासाठी आंदोलनही सुरू झाले आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व धरणात पुरेसा पाणी साठा असतानाही पाणी टंचाई होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 या तक्रारींची गांभीर्याने दखल महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतली आहे. विशेष बैठकीचे आयोजन करून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत असलेल्या घणसोली, ऐरोली व इतर परिसरात पुरेसे पाणी मिळत नाही. या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना करण्यात आल्या. शहर अभियंता संजय देसाई यांनी शहराची भौगोलीक परिस्थिती लक्षात घेवून पाणीपुरवठ्याचा विभागनिहाय अभ्यास करून जलकुंभ भरण्याच्या वेळांमध्यं बदल करण्याचा आराखडा बैठकीत सादर केला. 

बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे भागात पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार आहे. घणसोली विभागात सायंकाळी साडेआठ ते रात्री दोन, ऐरोली,दिघा विभागात दुपारी दोन ते पहाटे चार या वेळेत जलकुंभ भरले जाणार आहेत. शहरवासीयांना पुर्वीप्रमाणे सकाळी व सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा सुरू राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. यापुढे सर्व विभागांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

मोरबेतून ४५० दशलक्ष लीटर पाणीमहानगरपालिकेच्या मोरबे धरणात १८४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा शिल्लक आहे. येथून प्रतीदिन ४५० दशलक्ष लीटर पाणी शहराला पुरविले जात आहे. एमआयडीसीकडून ८० दशलक्ष लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तेथून ६० ते ६५ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून दिघा, ऐरोली, घणसोली, एमआयडीसीतील नेरूळ, शिवाजीनगर, बोनसरी,इंदिरानगर, गणपतीपाडा, महापेगाव, पावणेगाव, रबाळे, कातकरीपाडा, भीमनगर, आंबेडकरनगर, वाल्मिकीनगर, चिंचपाडा, यादवनगर, गवतेवाडी व संपूर्ण दिघा परिसराला पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी