शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

  पाणी पुरवठ्याचे संतुलन राखण्यासाठी मनपाने कसली कंबर; दिवसातून सात तास होणार पाणीपुरवठा 

By नामदेव मोरे | Updated: October 20, 2023 19:32 IST

जलकुंभ भरण्यासाठीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे.

नवी मुंबई : शहरातील सर्व विभागांमध्ये समान प्रमाणात पाणी मिळावे यासाठी महानगरपालिकेने वितरण प्रणालीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ भरण्यासाठीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. प्रत्येक विभागाला दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा केला जाणार असून अतीरिक्त जलस्त्रोतांचा शोधही सुरू केला आहे. नवी मुंबईमध्ये अनेक विभागामध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. पाण्यासाठी आंदोलनही सुरू झाले आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व धरणात पुरेसा पाणी साठा असतानाही पाणी टंचाई होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 या तक्रारींची गांभीर्याने दखल महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतली आहे. विशेष बैठकीचे आयोजन करून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत असलेल्या घणसोली, ऐरोली व इतर परिसरात पुरेसे पाणी मिळत नाही. या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना करण्यात आल्या. शहर अभियंता संजय देसाई यांनी शहराची भौगोलीक परिस्थिती लक्षात घेवून पाणीपुरवठ्याचा विभागनिहाय अभ्यास करून जलकुंभ भरण्याच्या वेळांमध्यं बदल करण्याचा आराखडा बैठकीत सादर केला. 

बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे भागात पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार आहे. घणसोली विभागात सायंकाळी साडेआठ ते रात्री दोन, ऐरोली,दिघा विभागात दुपारी दोन ते पहाटे चार या वेळेत जलकुंभ भरले जाणार आहेत. शहरवासीयांना पुर्वीप्रमाणे सकाळी व सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा सुरू राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. यापुढे सर्व विभागांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

मोरबेतून ४५० दशलक्ष लीटर पाणीमहानगरपालिकेच्या मोरबे धरणात १८४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा शिल्लक आहे. येथून प्रतीदिन ४५० दशलक्ष लीटर पाणी शहराला पुरविले जात आहे. एमआयडीसीकडून ८० दशलक्ष लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तेथून ६० ते ६५ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून दिघा, ऐरोली, घणसोली, एमआयडीसीतील नेरूळ, शिवाजीनगर, बोनसरी,इंदिरानगर, गणपतीपाडा, महापेगाव, पावणेगाव, रबाळे, कातकरीपाडा, भीमनगर, आंबेडकरनगर, वाल्मिकीनगर, चिंचपाडा, यादवनगर, गवतेवाडी व संपूर्ण दिघा परिसराला पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी