शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांच्या आरोपामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन; नऊ महिन्यांच्या परिश्रमांना गालबोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:13 IST

चाचणी न झालेल्या सहा हजार नावांचा यादीत समावेश

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोना चाचणीच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. ९ महिने अथकपणे घेतलेल्या परिश्रमांना गालबोट लागले आहे. चाचणी न केलेल्या जवळपास सहा हजार नावांचा यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. ही तांत्रिक चूक की जाणीवपूर्वक केलेला घोटाळा याविषयी तर्कवितर्क लढविले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त शहर करण्यासाठी २६१ दिवस अथकपणे परिश्रम घेत आहेत. अनेकांनी या कालावधीमध्ये एकही सुट्टी घेतलेली नाही. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या कालावधीमध्ये नवीन रुग्णालयांची उभारणी करण्यात आली. स्वत:ची आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू केली. प्रत्येक नोडमध्ये चाचणी केंद्र उभारले. या उपाययोजना सुरू असताना कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा अहवालही निगेटिव्ह दाखविल्याचे समोर आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या टीमने हा प्रकार निदर्शनास आणला असून या प्रकरणाची सखाेल चौकशी करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. कोरोना चाचण्यांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी असणारे डॉ. सचिन नेमाणे यांना तत्काळ निलंबित केले आहे. सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपआयुक्त योगेश कडूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नियुक्त केली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला त्याच्या संपर्कातील २० ते २५ जणांची नावे सांगणे अपेक्षित असते. संपर्कातील व्यक्तींचीही महानगरपालिकेच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत असते. वास्तविक ॲँटिजेन चाचणी करताना तेथील कर्मचाऱ्यांनी चाचणी करणारांना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची नावे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. ही नावे नागरी आरोग्य केंद्रातून विचारणे अपेक्षित असते. चाचणी केंद्रांमध्ये नावे विचारण्यात आली व तीच नावे चाचणी केलेल्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत अशा प्रकारची ६ हजार नावे चाचणी केलेल्या यादीमध्ये घुसविण्यात आल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नावे घुसविण्यात आली असतील तर ती तांत्रिक चूक आहे की मुद्दाम चाचण्यांची संख्या वाढविलेले दाखविले आहे हे तपासण्याची मागणी केली जात आहे.

ॲँटिजेन किटची मागणीमहानगरपालिकेच्या ॲँटिजेन चाचणी केंद्रांकडून काही दिवसांपूर्वी वाढीव किटची मागणी केली जात हाेती. अनेक केंद्रांमध्ये पुरेसे किट नाहीत. यामुळे तत्काळ किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्याने त्याविषयी प्रस्तावही तयार केला होता. परंतु त्याच वेळेला ४० हजार किट शिल्लक असल्याचे समोर आले. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात किट होते? तर किट नसल्याचे का भासविले जात होते? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोंदणीचे केंद्रीकरण का?सुरुवातीच्या काळात काेरोना चाचणी केंद्रांवरूनच किती चाचण्या झाल्या याविषयी संगणकीय नोंदणी केली जात होती. परंतु अचानक ही पद्धत बंद करून एकाच ठिकाणावरून त्यांची नोंदणी सुरू झाली. डाॅ. सचिन नेमाणे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात अनेक नागरी आरोग्य केंद्रे क्षेत्रांतील नावे वेळेत नोंदली जात नसल्याचे काही डॉक्टर खासगीत बोलू लागले होते.

चौकशी युद्धपातळीवर व्हावीकोरोना चाचण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी सलग ९ महिने रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. या आरोपामुळे सर्वांचे मनोबल खचण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाची युद्धपातळीवर चौकशी व्हावी. जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. ‘तांत्रिक चुका की घोटाळा?’ याविषयी वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका