शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

घोटाळ्यांच्या आरोपामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन; नऊ महिन्यांच्या परिश्रमांना गालबोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:13 IST

चाचणी न झालेल्या सहा हजार नावांचा यादीत समावेश

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोना चाचणीच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. ९ महिने अथकपणे घेतलेल्या परिश्रमांना गालबोट लागले आहे. चाचणी न केलेल्या जवळपास सहा हजार नावांचा यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. ही तांत्रिक चूक की जाणीवपूर्वक केलेला घोटाळा याविषयी तर्कवितर्क लढविले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त शहर करण्यासाठी २६१ दिवस अथकपणे परिश्रम घेत आहेत. अनेकांनी या कालावधीमध्ये एकही सुट्टी घेतलेली नाही. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या कालावधीमध्ये नवीन रुग्णालयांची उभारणी करण्यात आली. स्वत:ची आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू केली. प्रत्येक नोडमध्ये चाचणी केंद्र उभारले. या उपाययोजना सुरू असताना कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा अहवालही निगेटिव्ह दाखविल्याचे समोर आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या टीमने हा प्रकार निदर्शनास आणला असून या प्रकरणाची सखाेल चौकशी करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. कोरोना चाचण्यांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी असणारे डॉ. सचिन नेमाणे यांना तत्काळ निलंबित केले आहे. सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपआयुक्त योगेश कडूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नियुक्त केली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला त्याच्या संपर्कातील २० ते २५ जणांची नावे सांगणे अपेक्षित असते. संपर्कातील व्यक्तींचीही महानगरपालिकेच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत असते. वास्तविक ॲँटिजेन चाचणी करताना तेथील कर्मचाऱ्यांनी चाचणी करणारांना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची नावे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. ही नावे नागरी आरोग्य केंद्रातून विचारणे अपेक्षित असते. चाचणी केंद्रांमध्ये नावे विचारण्यात आली व तीच नावे चाचणी केलेल्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत अशा प्रकारची ६ हजार नावे चाचणी केलेल्या यादीमध्ये घुसविण्यात आल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नावे घुसविण्यात आली असतील तर ती तांत्रिक चूक आहे की मुद्दाम चाचण्यांची संख्या वाढविलेले दाखविले आहे हे तपासण्याची मागणी केली जात आहे.

ॲँटिजेन किटची मागणीमहानगरपालिकेच्या ॲँटिजेन चाचणी केंद्रांकडून काही दिवसांपूर्वी वाढीव किटची मागणी केली जात हाेती. अनेक केंद्रांमध्ये पुरेसे किट नाहीत. यामुळे तत्काळ किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्याने त्याविषयी प्रस्तावही तयार केला होता. परंतु त्याच वेळेला ४० हजार किट शिल्लक असल्याचे समोर आले. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात किट होते? तर किट नसल्याचे का भासविले जात होते? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोंदणीचे केंद्रीकरण का?सुरुवातीच्या काळात काेरोना चाचणी केंद्रांवरूनच किती चाचण्या झाल्या याविषयी संगणकीय नोंदणी केली जात होती. परंतु अचानक ही पद्धत बंद करून एकाच ठिकाणावरून त्यांची नोंदणी सुरू झाली. डाॅ. सचिन नेमाणे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात अनेक नागरी आरोग्य केंद्रे क्षेत्रांतील नावे वेळेत नोंदली जात नसल्याचे काही डॉक्टर खासगीत बोलू लागले होते.

चौकशी युद्धपातळीवर व्हावीकोरोना चाचण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी सलग ९ महिने रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. या आरोपामुळे सर्वांचे मनोबल खचण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाची युद्धपातळीवर चौकशी व्हावी. जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. ‘तांत्रिक चुका की घोटाळा?’ याविषयी वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका