शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

शहरातील जलसाठ्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 02:33 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. शहरातील १३२ पैकी फक्त ९४ विहिरींचे अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. शहरातील १३२ पैकी फक्त ९४ विहिरींचे अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे. तलावांसह दिघा येथील रेल्वेच्या धरणामधील पाण्याचाही अद्याप वापर करण्यात येत नाही. जलस्रोत भरपूर असल्यामुळे महापालिकेला व शहरवासीयांनाही या संपत्तीचे महत्त्व समजेनासे झाले आहे.राज्यातील अनेक प्रमुख शहरे व ग्रामीण भागामध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीमध्येच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. फक्त नवी मुुुंबई महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असून, पावसाळ्यापर्यंत एवढे पाणी धरणामध्ये शिल्लक आहे. एमआयडीसीचा परिसर वगळता शहरवासीयांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. धरण विकत घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर जलसाठ्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तब्बल १३२ विहिरी होत्या; परंतु त्यांची देखभाल केली नसल्यामुळे अनेक विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये फक्त ९४ विहिरी अस्तित्वात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यांचीही स्थिती बिकट आहे. अनेक ठिकाणी विहिरींमध्ये गाळ साचला आहे, वेली व झुडपे वाढली आहेत. काही विहिरींमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असूनही त्याचा वापर होत नाही. विहिरींची मालकी महापालिकेकडे आहे; परंतु त्यामधील पाणीचोरी करून त्याची विक्री केली जात आहे. विहिरींमधील गाळ काढणे, औषध टाकण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.विहिरींप्रमाणे तलावांमधील पाण्याचाही वापर होत नाही. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये २४ तलाव आहेत. अनेक तलावांमध्ये उन्हाळ्यामध्येही पाणी असते. तलाव व्हिजन अंतर्गत पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तलावांमध्ये गॅबियन वॉल टाकली. परिसराचे सुशोभीकरण केले; पण येथील पाण्याचा वापर करण्यासाठी मात्र ठोस उपाययोजना केल्या नाहीत. तलावाला लागून असलेल्या उद्यानांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. एमआयडीसीकडून एक दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. या परिसरामध्ये रेल्वेचे धरण आहे; पण त्या धरणाचे हस्तांतरण करून घेण्यास विलंब होत आहे. धरणातील पाण्याचाही काहीच उपयोग केला जात नाही. नवी मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती मिळाली असून, तिचे महत्त्व पटत नसल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागली आहे.घणसोलीमध्ये सर्वाधिक विहिरीघणसोली विभागात सर्वाधिक विहिरींची संख्या गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात आहे. पावसाळ्यापूर्वी विहिरीची साफसफाई केल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला, तरी आता अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ, झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या विहिरी आहेत की डबकी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीनबावडी विहिरींना वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे विळखा घातलेला आहे. चिंचआळी येथे ब्रिटिश राजवटीतील विहीर आहे. गुणाळे तलावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. तर रस्त्यालगत असलेल्या रानकर विहिरीची डेब्रिज व भरावामुळे दैना झाली आहे.बाहेरून रंगरंगोटीवाशी सेक्टर ७ येथील जागृतेश्वर शिवमंदिर परिसरात तलाव व दोन विहिरी आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत या विहिरींची बाहेरून रंगरंगोटी करण्यात आली आहे; पण वाहिरीची आतून स्वच्छता न झाल्याने शेवाळे, पालापाचोळ्यामुळे पाण्यात कचरा साचलेला दिसतो. पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे ते वापरण्याजोगे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुहूगावच्या तलावालगतच्या विहिरीची अवस्थाही अशीच आहे.नेरुळमध्येही दुरवस्थानेरुळ विभागात सरसोळे गाव सेक्टर ६ येथे दोन विहिरी आहेत. दोन्ही विहिरींची अवस्था बिकट आहे. एका विहिरीवर मोठा वृक्ष आहे. तत्कालीन नगरसेवक नारायण पाटील यांच्या कार्यकाळात विहिरींची महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी दूषित झाले आहे. शिवाय येथील लोखंडी जाळ्याही गंजल्या आहेत. पालिकेच्या परवानगीशिवाय येथील पाण्याची बांधकाम व्यवसायासाठी विक्री होत आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील परिमंडळ१ आणि २ मधील विहिरींच्या साफसफाईबाबत पाणीपुरवठा विभागाकडून ठेकेदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आठवडाभरात पाहणी करून विहिरींची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल.- मनोहर सोनावणे,कार्यकारी अभियंता,पाणीपुरवठा विभाग

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई