शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील जलसाठ्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 02:33 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. शहरातील १३२ पैकी फक्त ९४ विहिरींचे अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. शहरातील १३२ पैकी फक्त ९४ विहिरींचे अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे. तलावांसह दिघा येथील रेल्वेच्या धरणामधील पाण्याचाही अद्याप वापर करण्यात येत नाही. जलस्रोत भरपूर असल्यामुळे महापालिकेला व शहरवासीयांनाही या संपत्तीचे महत्त्व समजेनासे झाले आहे.राज्यातील अनेक प्रमुख शहरे व ग्रामीण भागामध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीमध्येच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. फक्त नवी मुुुंबई महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असून, पावसाळ्यापर्यंत एवढे पाणी धरणामध्ये शिल्लक आहे. एमआयडीसीचा परिसर वगळता शहरवासीयांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. धरण विकत घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर जलसाठ्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तब्बल १३२ विहिरी होत्या; परंतु त्यांची देखभाल केली नसल्यामुळे अनेक विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये फक्त ९४ विहिरी अस्तित्वात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यांचीही स्थिती बिकट आहे. अनेक ठिकाणी विहिरींमध्ये गाळ साचला आहे, वेली व झुडपे वाढली आहेत. काही विहिरींमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असूनही त्याचा वापर होत नाही. विहिरींची मालकी महापालिकेकडे आहे; परंतु त्यामधील पाणीचोरी करून त्याची विक्री केली जात आहे. विहिरींमधील गाळ काढणे, औषध टाकण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.विहिरींप्रमाणे तलावांमधील पाण्याचाही वापर होत नाही. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये २४ तलाव आहेत. अनेक तलावांमध्ये उन्हाळ्यामध्येही पाणी असते. तलाव व्हिजन अंतर्गत पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तलावांमध्ये गॅबियन वॉल टाकली. परिसराचे सुशोभीकरण केले; पण येथील पाण्याचा वापर करण्यासाठी मात्र ठोस उपाययोजना केल्या नाहीत. तलावाला लागून असलेल्या उद्यानांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. एमआयडीसीकडून एक दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. या परिसरामध्ये रेल्वेचे धरण आहे; पण त्या धरणाचे हस्तांतरण करून घेण्यास विलंब होत आहे. धरणातील पाण्याचाही काहीच उपयोग केला जात नाही. नवी मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती मिळाली असून, तिचे महत्त्व पटत नसल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागली आहे.घणसोलीमध्ये सर्वाधिक विहिरीघणसोली विभागात सर्वाधिक विहिरींची संख्या गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात आहे. पावसाळ्यापूर्वी विहिरीची साफसफाई केल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला, तरी आता अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ, झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या विहिरी आहेत की डबकी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीनबावडी विहिरींना वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे विळखा घातलेला आहे. चिंचआळी येथे ब्रिटिश राजवटीतील विहीर आहे. गुणाळे तलावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. तर रस्त्यालगत असलेल्या रानकर विहिरीची डेब्रिज व भरावामुळे दैना झाली आहे.बाहेरून रंगरंगोटीवाशी सेक्टर ७ येथील जागृतेश्वर शिवमंदिर परिसरात तलाव व दोन विहिरी आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत या विहिरींची बाहेरून रंगरंगोटी करण्यात आली आहे; पण वाहिरीची आतून स्वच्छता न झाल्याने शेवाळे, पालापाचोळ्यामुळे पाण्यात कचरा साचलेला दिसतो. पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे ते वापरण्याजोगे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुहूगावच्या तलावालगतच्या विहिरीची अवस्थाही अशीच आहे.नेरुळमध्येही दुरवस्थानेरुळ विभागात सरसोळे गाव सेक्टर ६ येथे दोन विहिरी आहेत. दोन्ही विहिरींची अवस्था बिकट आहे. एका विहिरीवर मोठा वृक्ष आहे. तत्कालीन नगरसेवक नारायण पाटील यांच्या कार्यकाळात विहिरींची महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी दूषित झाले आहे. शिवाय येथील लोखंडी जाळ्याही गंजल्या आहेत. पालिकेच्या परवानगीशिवाय येथील पाण्याची बांधकाम व्यवसायासाठी विक्री होत आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील परिमंडळ१ आणि २ मधील विहिरींच्या साफसफाईबाबत पाणीपुरवठा विभागाकडून ठेकेदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आठवडाभरात पाहणी करून विहिरींची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल.- मनोहर सोनावणे,कार्यकारी अभियंता,पाणीपुरवठा विभाग

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई