शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाकडे महापालिकेचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:12 IST

पावसाळी कालावधीत पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यादृष्टीने नाले व गटारे सफाई कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.

नवी मुंबई : पावसाळी कालावधीत पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यादृष्टीने नाले व गटारे सफाई कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून पावसाळापूर्व गटारे सफाईचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तसेच नैसर्गिक नाल्यांमधील पाणी प्रवाहित राहण्याकरिता नाल्यातील अडथळे दूर करण्याचे साफसफाईचे काम ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मान्सूनपूर्व कामे ३0 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे.लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रि येत अडकलेली पावसाळी नाले व गटारे साफसफाईची कामे मार्गी लावण्याकरिता महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेत निवडणूक आयोगाकडून ही कामे करण्यास मान्यता मिळविलेली होती व ही कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कंत्राटदारांना दिले होते. महानगरपालिकेच्या ८ प्रशासकीय विभागात एकूण ९१ गटांमार्फत सुरू करण्यात आलेली गटारे सफाईच्या कामांचा नियमित आढावा घेतला जात असून आतापर्यंत ९५ टक्के कामे पूर्ण झालेली असून ३0 मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने या कामांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.नैसर्गिक नाल्यांमधील पाणी प्रवाहित राहण्यासाठी येणारे अडथळे दूर करून त्यांच्या साफसफाईसाठी ७८ गटांमध्ये आठही विभागांत कामे सुरू असून ८६ टक्के कामे पूर्ण झाली आहेत व त्यांचीही सफाई ३0 मेपर्यंतपूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीसुरू आहे. विहित कालावधीत हीकामे पूर्ण होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची यंत्रणा काम करीत असून दैनंदिन निरीक्षणातून याकडे लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती उपआयुक्त तुषार पवार यांनी दिली.महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले व गटारे सफाई विहित कालावधीत काटेकोरपणे व्हावी व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यासोबतच संबंधित विभागाचे विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता आणि पावसाळी कालावधीसाठी नियुक्त केलेले प्रत्येक विभागासाठीचे नोडल आॅफिसर यांनीही या कामांकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.