शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील कचऱ्याला येणार सोन्याचा भाव

By नामदेव मोरे | Updated: July 8, 2024 11:42 IST

तिसऱ्यांदा एपीएमसीत कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे ओला कचरा निर्मितीचे नवी मुंबईतील सर्वांत मोठे केंद्र. येथून रोज ५० ते ६० टन कचरा तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर पाठविला जातो. या कचऱ्यातून महानगरपालिका खतनिर्मिती करते. बाजार समितीने कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा दोनवेळा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी झाला नाही. आता पुन्हा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. प्रस्तावित प्रकल्प यशस्वी झाला तर बाजार समितीमधील कचऱ्याचीही किंमत वाढणार असून त्यातून खत, वीज किंवा बायोगॅस निर्मिती शक्य होईल.

आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. वर्षाला १० ते १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल येथे होते. १ लाख नागरिकांना थेट रोजगार मिळताे. रोज मार्केटमध्ये ५० ते ६० टन कचरा निर्माण होतो. यामध्ये ४० ते ४५ टन ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. बाजार समितीमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीची सुविधा नसल्यामुळे हा कचरा पालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर पाठविला जाताे. पालिका या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करत आहे. या खताची ठेकेदाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विक्री केली जात आहे. बाजार समितीने स्वत:च कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे पालिका आयुक्तांनी सुचविले आहे.

ओल्या कचऱ्याची किंमत लक्षात घेऊन बाजार समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, बायोगॅस किंवा इतर कोणता प्रकल्प उभारता येईल. कोणता प्रकल्प बाजार समितीसाठी लाभदायक ठरेल. प्रकल्पासाठी किती जागा लागेल, खर्च किती येईल व त्यापासून किती उत्पन्न मिळेल याचा आढावा घेतला जाणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर कचऱ्याचीही किंमत वाढणार असून बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

२०११ चा प्रयोग फसला

बाजार समितीने २०११ मध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विस्तारित भाजी मार्केटचे उद्घाटन व वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते; परंतु यासाठी जागाच मिळाली नसल्यामुळे तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर बायोगॅस निर्मिती प्रकल्प तयार करण्याची चाचपणी करण्यात आली होती; पण तो प्रयोगही प्रत्यक्षात सुरू झाला नाही. 

आता तिसऱ्यांदा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असून यावेळी तो प्रत्यक्षात साकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या मार्केटमधून किती कचरा?मार्केट    दैनंदिन कचरा (टन) फळ मार्केट    २० ते २५ भाजीपाला    १५ ते २० कांदा    ५मसाला    ४धान्य    ४ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न