शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

पेण अर्बनच्या ठेवीदारांचे आंदोलन

By admin | Updated: September 21, 2015 03:27 IST

बहुचर्चित पेण अर्बन बँकेतील ७५८ कोटीच्या महाघोटाळ््याला २२ सप्टेंबरला पाच वर्षे होत आहेत. तपासाबाबत समाधानकारक प्रगती नसल्याने ठेवीदार चांगलेच हवालदील झाले आहेत

आविष्कार देसाइ, अलिबागबहुचर्चित पेण अर्बन बँकेतील ७५८ कोटीच्या महाघोटाळ््याला २२ सप्टेंबरला पाच वर्षे होत आहेत. तपासाबाबत समाधानकारक प्रगती नसल्याने ठेवीदार चांगलेच हवालदील झाले आहेत. गणेश विसर्जनानंतर १५ हजार ज्येष्ठ नागरिक ठेवीदार रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोकणार आहेत. याबाबतचे पत्र १९ सप्टेंबररोजी जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे.संघर्ष समितीच्या या भुमिकेमुळे पेण अर्बन बँक महाघोटाळ््या विरोधातील आंदोलन तीव्र होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.पेण अर्बन बँकेमध्ये एक लाख ९३ हजार ठेवीदार, खातेदार आहेत. यांच्या घामाच्या ठेवींवर डल्ला मारणारे अद्याप मोकाटच आहेत. बेकायदा कर्ज वाटप करुन शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा ठेवदारांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आरोपींना शासन करुन ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्याच्या वल्गना राजकारणी आणि पोलिसांनी वेळोवळी केल्या होत्या. मात्र तपासात काहीच प्रगती होत नव्हती. २० मार्च २०११ रोजी पेण संघर्ष समितीने बेमुदत उपोषण केल्यानंतर या महाघोटाळ््याच्या तपासाला काही प्रमाणात वेग आला. पेण अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, आॅडीटर्स यांच्या विरोधात २२ मार्च २०११ रोजी पेण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. संर्घष समितीने दट्या दिल्यानंतरच तपास यंत्रणा तात्पुरती हालली होती.२२ सप्टेंबर २०१५ रोजी या महाघोटाळ््याला तब्बल पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षात सर्वसामान्य ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक हे आपल्या हक्काच्या पैशापासून अजूनही वंचित आहेत. एप्रिल २०१५ रोजी विशेष स्थापलेल्या तपास पथकाने आतापर्यंत किती जणांवर गुन्हे दाखल केले त्याचप्रमाणे महाघोटाळ््यात किती रक्कम वसूल झाली आहे. याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी घ्यावी, अशा मागणीचे पत्र पेण अर्बन बँक ठेवीदार संर्घष समितीने १९ सप्टेंबर २०१५च्या पत्रान्वये केली आहे.१२८ बोगस कर्ज खात्यांद्वारे ७५८ कोटी रुपयांची कशी पध्दशीरपणे लूट झाली आहे. याची सर्व कागदपत्रे, बोगस कर्ज खात्यांच्या २२ हजाराहून ंअधकि बँक एन्ट्रीज याची तपशिलवार माहिती तपास यंत्रणेला देण्यात आली आहे. अशी माहिती बँकेतर्फे देऊनही तपास यंत्रणा सुस्त आणि निषक्रीय का असा सवाल संघर्ष समितीने जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांना केला आहे.128बोगस खात्यांपैकी किती खात्यांचा तपास झाला, किती बोगस खातेदारांवर प्रत्यक्ष कारवाई झाली, किती वसूल झाली, तपास पथक आणि विशेष तपास पथकाने केलेली कारवाई, त्यांना काही कालबध्द कार्यक्रम दिला आहे का, त्याचप्रमाणे तापस प्रकरणी येणारा खर्च पिडीत बँक म्हणजेच ठेवीदारांकडून वसूल करणे अपेक्षीत आहे का अशी माहिती मिनल खोपकर या महिलेने मागितली आहे.48 आरोपींवर दोषारोपपत्र सादर केले एवढीच माहिती देण्यात आली असून उर्वरीत माहिती तपास सुरु असल्याने देता येत नसल्याचे म्हटले आहे. तपास यंत्रणेतेच्या बोटचेपे धोरणा विरोधात आवाज उठविण्यासाठी पोलिस अधिक्षकांच्या दारात मुक्काम ठोकणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी लोकमतला दिली.विशेष तपास यंत्रणेला स्टेशनरीचा पुरवठाविशेष तपास यंत्रणेला सुमारे नऊ हजार रुपयांची स्टेशनरी देण्यात आली आहे. वाहन, चालक, संगणक, संगणक परिचालक यांचीही मागणी विशेष तपास पथकाने केली होती. मात्र ठेवीदारांच्याच पैशातून तपास करणार आहात का असा सवाल तपास यंत्रणेला केल्याचेही नरेन जाधव यांनी सांगतिले.