शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पेण अर्बनच्या ठेवीदारांचे आंदोलन

By admin | Updated: September 21, 2015 03:27 IST

बहुचर्चित पेण अर्बन बँकेतील ७५८ कोटीच्या महाघोटाळ््याला २२ सप्टेंबरला पाच वर्षे होत आहेत. तपासाबाबत समाधानकारक प्रगती नसल्याने ठेवीदार चांगलेच हवालदील झाले आहेत

आविष्कार देसाइ, अलिबागबहुचर्चित पेण अर्बन बँकेतील ७५८ कोटीच्या महाघोटाळ््याला २२ सप्टेंबरला पाच वर्षे होत आहेत. तपासाबाबत समाधानकारक प्रगती नसल्याने ठेवीदार चांगलेच हवालदील झाले आहेत. गणेश विसर्जनानंतर १५ हजार ज्येष्ठ नागरिक ठेवीदार रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोकणार आहेत. याबाबतचे पत्र १९ सप्टेंबररोजी जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे.संघर्ष समितीच्या या भुमिकेमुळे पेण अर्बन बँक महाघोटाळ््या विरोधातील आंदोलन तीव्र होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.पेण अर्बन बँकेमध्ये एक लाख ९३ हजार ठेवीदार, खातेदार आहेत. यांच्या घामाच्या ठेवींवर डल्ला मारणारे अद्याप मोकाटच आहेत. बेकायदा कर्ज वाटप करुन शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा ठेवदारांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आरोपींना शासन करुन ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्याच्या वल्गना राजकारणी आणि पोलिसांनी वेळोवळी केल्या होत्या. मात्र तपासात काहीच प्रगती होत नव्हती. २० मार्च २०११ रोजी पेण संघर्ष समितीने बेमुदत उपोषण केल्यानंतर या महाघोटाळ््याच्या तपासाला काही प्रमाणात वेग आला. पेण अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, आॅडीटर्स यांच्या विरोधात २२ मार्च २०११ रोजी पेण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. संर्घष समितीने दट्या दिल्यानंतरच तपास यंत्रणा तात्पुरती हालली होती.२२ सप्टेंबर २०१५ रोजी या महाघोटाळ््याला तब्बल पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षात सर्वसामान्य ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक हे आपल्या हक्काच्या पैशापासून अजूनही वंचित आहेत. एप्रिल २०१५ रोजी विशेष स्थापलेल्या तपास पथकाने आतापर्यंत किती जणांवर गुन्हे दाखल केले त्याचप्रमाणे महाघोटाळ््यात किती रक्कम वसूल झाली आहे. याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी घ्यावी, अशा मागणीचे पत्र पेण अर्बन बँक ठेवीदार संर्घष समितीने १९ सप्टेंबर २०१५च्या पत्रान्वये केली आहे.१२८ बोगस कर्ज खात्यांद्वारे ७५८ कोटी रुपयांची कशी पध्दशीरपणे लूट झाली आहे. याची सर्व कागदपत्रे, बोगस कर्ज खात्यांच्या २२ हजाराहून ंअधकि बँक एन्ट्रीज याची तपशिलवार माहिती तपास यंत्रणेला देण्यात आली आहे. अशी माहिती बँकेतर्फे देऊनही तपास यंत्रणा सुस्त आणि निषक्रीय का असा सवाल संघर्ष समितीने जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांना केला आहे.128बोगस खात्यांपैकी किती खात्यांचा तपास झाला, किती बोगस खातेदारांवर प्रत्यक्ष कारवाई झाली, किती वसूल झाली, तपास पथक आणि विशेष तपास पथकाने केलेली कारवाई, त्यांना काही कालबध्द कार्यक्रम दिला आहे का, त्याचप्रमाणे तापस प्रकरणी येणारा खर्च पिडीत बँक म्हणजेच ठेवीदारांकडून वसूल करणे अपेक्षीत आहे का अशी माहिती मिनल खोपकर या महिलेने मागितली आहे.48 आरोपींवर दोषारोपपत्र सादर केले एवढीच माहिती देण्यात आली असून उर्वरीत माहिती तपास सुरु असल्याने देता येत नसल्याचे म्हटले आहे. तपास यंत्रणेतेच्या बोटचेपे धोरणा विरोधात आवाज उठविण्यासाठी पोलिस अधिक्षकांच्या दारात मुक्काम ठोकणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी लोकमतला दिली.विशेष तपास यंत्रणेला स्टेशनरीचा पुरवठाविशेष तपास यंत्रणेला सुमारे नऊ हजार रुपयांची स्टेशनरी देण्यात आली आहे. वाहन, चालक, संगणक, संगणक परिचालक यांचीही मागणी विशेष तपास पथकाने केली होती. मात्र ठेवीदारांच्याच पैशातून तपास करणार आहात का असा सवाल तपास यंत्रणेला केल्याचेही नरेन जाधव यांनी सांगतिले.