शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पाणी टंचाईविरोधात नवी मुंबई विकास आघाडीचे आंदोलन; नेरूळ कार्यालयावर मोर्चा 

By नामदेव मोरे | Updated: August 29, 2023 19:32 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्यामळे संतापलेल्या नागरिकांनी नवी मुंबई विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली नेरूळ विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. पाणी समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

रिपब्लीकन सेना, घर हक्क संघर्ष समीती, शेकाप, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी, आरपीआय खरात गट व इतर राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. महात्मा गांधी नगर, रमेश मेटल क्वारी, आंबेडकर नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरात इतर ठिकाणीही पाणी समस्या गंभीर झाली आहे. वारंवार निवेदन करूनही पाणी समस्या सोडविली जात नाही. नेरूळ विभाग कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारूनही या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांनी मोर्चा काढला होता. 

झोपडपट्टी परिसरातील पाणी समस्या तत्काळ सोडविण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. या व्यतिरिक्त पथदिवे, पदपथ, आरोग्य सुविधा, प्रसाधनगृह व इतर समस्या सोडविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये खाजामिया पटेल, चंद्रशेखर रानडे, सलिम मुल्ला, बाबा न्यायनीत, अशोक जमादार, प्रकाश वाकोडे, महेंद्र वर्मा, दिपा बम, संगीता चौधरी, प्रकाश वानखेडे, दादा भालेराव, कैलाश सरकटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई