शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कोरोनामुळे नवीन पनवेल, कामोठेमध्ये सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:32 IST

महापालिकेची चिंता वाढली : इमारतीमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे बळी जाणाऱ्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पालिका क्षेत्रात नवीन पनवेल, कामोठे, पनवेलमध्ये सर्वाधिक कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. सोमवारपर्यंत येथे कोरोनामुळे ३७१ जणांचा बळी गेला आहे.पनवेल महापलिका क्षेत्रात विशेषत: इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिका प्रशासनास कोरोना संसर्गाला रोखण्यात यश आले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली या परिसरात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. नवीन पनवेल, कामोठे, पनवेल या परिसरात कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत.सोमवारपर्यंत पनवेल पालिका क्षेत्रात १६,६९२ जणांना कोरोनाची लागन झाली आहे, तर ३७१ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. यात सर्वाधिक नवीन पनवेल येथे ९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर, कामोठे परिसरात ८५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. पनवेल शहरात ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडण्यात कोरोनाबाधितांना सुविधा, तसेच आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता, कोरोनाबाबत अज्ञानता, बेड शोधण्यात जाणारा वेळ, वेळेवर न मिळणारी अ‍ॅम्बुलन्स या सर्व बाबी कारणीभूत आहेत. दिवसेंदिवस वाढते रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाºया संखेत वाढ होत असल्यामुळे महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस