शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

सुरक्षा अधिकाऱ्यांची मक्तेदारी; मार्केट यार्डमध्ये एकाधिकारशाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:01 IST

राजकीय दबाव आणून बदली 

नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रत्येक मार्केटमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. अनेकांची १० ते २० वर्षे बदलीच झालेली नाही. बदलीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. बदली केलीच तर राजकीय दबाव आणून ती थांबविली जात असल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.

सुरक्षा विभागाला शिस्त राहिलेली नसून, त्यामुळे बाजार समितीमध्ये अवैध गुटखा, अमली पदार्थांची विक्री व इतर गुन्हेगारांना आश्रय मिळू लागला आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  पाच प्रमुख मार्केट, एक विस्तारित मार्केट, मध्यवर्ती सुविधागृह, शीतगृह, निर्यात भवन असे विविध प्रकल्प आहेत. मार्केट परिसराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन आहे. याच परिसरात पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आहे. 

राजकीय दबाव आणून बदली 

भाजीपाला, फळ, धान्य व इतर मार्केटमध्येही अनेकजण कायमस्वरूपी याच मार्केटमध्ये नियुक्ती झाल्याच्या आविर्भावामध्ये काम करत आहेत.सुरक्षा विभागामधील कर्मचाऱ्यांची बदली झाली की लगेच संबंधित कर्मचारी राजकीय दबाव आणून बदली थांबवत आहेत. आमदार, मंत्री व इतर वजनदार व्यक्तींचा फोन आला की बदली लगेच रद्द केली जात आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच शिफ्टमध्ये काम करत आहेत.

ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न     पाचही मार्केटमध्ये गुटख्याची बिनधास्त विक्री    भाजीपाला व फळ मार्केटमध्ये छुप्या पद्धतीने गांजा विक्री    फळ व भाजी मार्केट परिसरामध्ये देहविक्री करणाऱ्यांचा वावर वाढू लागला आहे. भाजीपाला, फळ, मसाला मार्केटमध्ये विनापरवाना मुक्काम करणाऱ्या अनोंदीत कामगारांची संख्या वाढली. 

बाजार समितीच्या कामकाजामध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. सुरक्षा विभागामधील कर्मचाऱ्यांच्याही लवकरच बदल्या करण्यात येणार  आहेत. बदलीच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. - पी. एल. खंडागळे, सचिव बाजार समिती 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती