शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोमवारी बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:49 IST

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह गाढी नदीमध्ये सापडला आहे. तर दुसºया मुलाचा शोध सुरू आहे. मात्र, या शोधमोहिमेच्या वेळी पनवेलमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर आला आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह गाढी नदीमध्ये सापडला आहे. तर दुसºया मुलाचा शोध सुरू आहे. मात्र, या शोधमोहिमेच्या वेळी पनवेलमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर आला आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह पनवेलमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. याशिवाय प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, येथील आपत्ती व्यवस्थापनाला परिस्थितीचे फारसे गांभीर्य दिसत नाही. दरड कोसळणे किंवा इतर आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तयारी केली जाते. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासोबतच आपत्ती उद्भवल्यास त्याचा मुकाबला कसा करावा, याची तयारी करून घेतली जाते; परंतु याबाबत फक्त कागदोपत्री देखावा करण्यात येतो. त्यामुळेच एखादी मोठी आपत्ती निर्माण झाल्यानंतर या विभागाच्या मर्यादा स्पष्ट होतात.अतिवृष्टी झाली, पूर आला, वीज पडली, भूकंप झाला, त्यातून नुकसान झाले. अशा वेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असावी लागते. मात्र, पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज नसल्याचे दिसत आहे. सुकापूर येथे राहणारे प्रथमेश नानाभाऊ पाटील (६) व मयांक अडसूळ (३.५ वर्षे) हे दोघे रविवारी खेळायला बाहेर गेले होते; पण बराच वेळ झाला तरी ते दोघे घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही दोन्ही मुले गणेशघाटावर खेळत असल्याचे रहिवाशांनी पाहिले होते. त्यामुळे सिडकोच्या अग्निशमन दलाची तीन पथके तसेच पनवेल महापालिका अग्निशमन दलाच्या दोन पथकांनी शोधकार्य सुरू केले.