शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मनसेने लावला महाराष्ट्र भवनचा नामफलक, शासनाच्या दिरंगाईचा निषेध : १ मेला भूमिपूजनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:53 IST

वाशी सेक्टर ३० अ मध्ये महाराष्ट्र भवनसाठी भूखंड राखीव ठेवला आहे; परंतु येथे प्रत्यक्ष भवनचे काम केले जात नाही. मनसेने या भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला.

नवी मुंबई : वाशी सेक्टर ३० अ मध्ये महाराष्ट्र भवनसाठी भूखंड राखीव ठेवला आहे; परंतु येथे प्रत्यक्ष भवनचे काम केले जात नाही. मनसेने या भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला. १ मेपर्यंत शासनाने काहीच कार्यवाही केली नाही तर भूमिपूजन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.सिडकोने वाशी रेल्वे स्टेशनसमोर सर्व राज्यांचे भवन निर्माण करण्यासाठी भूखंड आरक्षित केले आहेत. आसाम, उत्तर प्रदेश, मेघालय, केरळ, राजस्थान व इतर काही राज्यांनी या भूखंडावर त्यांच्या राज्यांचे भव्य भवन उभे केले आहेत. महाराष्ट्र भवनसाठी सेक्टर ३० अ मध्ये भूखंड राखीव ठेवला आहे. १५ वर्षांनंतरही अद्याप या भूखंडाचा विकास करण्यात आलेला नाही. सिडकोने येथे लावलेला नामफलकही गायब झाल्याने तो भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याची शक्यता असल्याने मनसेने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून त्या भूखंडावर भवनचा नामफलक लावला आहे. शहर प्रमुख गजानन काळे व इतर पदाधिकाºयांनी भवनचे काम झालेच पाहिजे, सिडको व राज्य शासनाचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. सदर भूखंड महाराष्ट्र भवनसाठी राखीव असून कोणीही अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.राज्य शासनाने या भूखंडाचा विकास करावा. राज्याच्या कानाकोपºयातून स्पर्धा परीक्षा व इतर कामांसाठी येणाºया विद्यार्थ्यांना या भवनचा उपयोग होऊ शकतो.१ मेपर्यंत शासनाने भूमिपूजनासाठी योग्य निर्णय घेतला नाही तर मनसे स्वत:च भूमिपूजन करेल, असा इशारा मनसेचे शहर प्रमुख गजानन काळे यांनी दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई