शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

नवी मुंबईत मनसेने पाकिस्तानचे झेंडे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:38 IST

पाकिस्तानची साखर विकू नये या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंदोलन केले.

नवी मुंबई : पाकिस्तानची साखर विकू नये या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंदोलन केले. पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध केला. व्यापाऱ्यांनीही मार्केटमध्ये पाकिस्तानची साखर आलेली नाही व यापुढेही विकली जाणार नसल्याचे आश्वासन दिले.देशात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. पुरेसा साठा असूनही पाकिस्तानवरून साखर आयात करून कमी दराने विकली जात आहे. राज्यातील शेतकºयांचे नुकसान करण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप करून मनसेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गोडाऊनमध्ये जाऊन पाहणी केली. सर्व साखर व्यापाºयांची भेट घेऊन त्यांना पाकिस्तानची साखर घेऊ नये व ग्राहकांना विकू नये अशा आशयाचे पत्र दिले. मार्केटमध्ये पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध केला. शुगर मर्चंट असोसिएशनने मनसे शिष्टमंडळाला पाकिस्तानची साखर न विकण्याचे आश्वासन दिले. नवी मुंंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे म्हणाले, राज्यात साखरेचा पुरेसा साठा असताना पाकिस्तानची साखर आयात करून स्वस्त दरात विकली जात आहे.पणनमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सद्य:स्थितीमध्ये राज्यामध्ये कुठेही पाकिस्तानची साखर विकली जात नाही. विकली जात असल्यास त्याची माहिती घेतली जाईल. केंद्र शासनाने आयात शुल्कामध्ये १०० टक्के वाढ केली असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.