शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:14 IST

७८.६६ मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई : एसटीमधून आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नाही, मग खासगी गाडीतून प्रवास करताना ई-पास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत ई-पास मंजूर करण्यासाठी पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक जिल्ह्यांच्या सीमांवर ई-पास तपासणी करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका सहन केलेल्या सर्वसामान्यांची जाचक अटींतून सूटका करावी आणि प्रवासासाठी ई-पास तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी मनसेच्या वतीने शुक्रवारी दुपारी ऐरोली टोल नाक्यावर ई-पासची होळी करून आंदोलन करण्यात आले. टोल नाके, सीमानाके किंवा तपासणी नाके येथे कोणत्याही पासची तपासणी केली जात नाही, मग प्रवासासाठी ई-पासची सक्ती कशासाठी, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ई-पासची होळी करून आंदोलन केले. यावेळी आंदोलनात प्रसाद घोरपडे, धनंजय भोसले, नितीन लष्कर, चंद्रकांत महाडिक, भूषण आगिवले आदी उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसेtollplazaटोलनाका