शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी गटारात सोडण्याची नामुष्की

By admin | Updated: June 28, 2017 03:35 IST

महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे. पाणीविक्री करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्याचा अपव्यय व पालिकेचे नुकसान थांबविण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरुळ व वाशीमध्ये १०० एमएलडी, ऐरोलीमध्ये ८० एमएलडी क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे. देशात सर्वात अत्याधुनिक केंद्र उभारणारी महापालिका म्हणूनही नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने मलनि:सारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये सादर करताना प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याचा दावा केला होता; पण प्रत्यक्षात पाणीविक्री करण्यात यश आलेले नाही. सद्यस्थितीमध्ये सात मलनि:सारण केद्रांमधून प्रतिदिन १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याऐवजी ते खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. यामुळे मलनि:सारण केंद्रांच्या देखभालीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी गत आठवड्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. प्रक्रिया केलेले पाणी खाडीमध्ये सोडून द्यावे लागते. मलनि:सारण केंद्र उभारल्यापासून योग्य नियोजन केले असते, तर आतापर्यंत या पाण्याची विक्री होऊ शकली असती; परंतु प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी अद्याप पाणीविक्री होऊ शकली नाही.